शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

खरिपासाठी दोन लाख टन खताचे आवंटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:22 AM

खरीप हंगाम २०२१-२२साठी कृषी विभागातर्फे दरवर्षी पुणे कृषी आयुक्तालयाकडे लागणारे रासायनिक खत तसेच शिल्लक खताचा ताळमेळ घालून आवंटन मंजुरीसाठी ...

खरीप हंगाम २०२१-२२साठी कृषी विभागातर्फे दरवर्षी पुणे कृषी आयुक्तालयाकडे लागणारे रासायनिक खत तसेच शिल्लक खताचा ताळमेळ घालून आवंटन मंजुरीसाठी पाठवले जाते. आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख ७५ हजार ८०२ हेक्टरवर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. गत दोन वर्षांच्या तुलनेत खरीप हंगामात सुमारे एक लाख हेक्टर जादा क्षेत्रावर नियोजन केले आहे. यासाठी लागणारे बियाणे, खताचे नियोजन कृषी विभाग मागील एका महिन्यापासून करीत आहे.

यंदा जिल्ह्यात विविध प्रकारच्या दोन लाख ९१ हजार ९०० मे. टन खताची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाने कळविले होते. त्यानुसार पुणे कृषी आयुक्तालयाकडून दोन लाख १४ हजार ३६० टन आवंटन मंजूर केले आहे. मागील हंगामातील एक लाख चार हजार ६७८ मे. टन खत शिल्लक राहिले आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांना हंगामापूर्वी खतांची कमतरता पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

मागणी अन‌् मंजूर खत

युरिया एक लाख २५ हजार टन (मागणी), ९३ हजार २५० टन (मंजूर), डीएपी ५० हजार टन (मागणी), ३२ हजार ४५० टन (मंजूर), एमओपी ३२ हजार टन (मागणी), १९ हजार ७५० हजार टन (मंजूर), एसएसपी २२ हजार टन (मागणी), २३ हजार ५५० टन (मंजूर), संयुक्त खते ६२ हजार ९०० टन (मागणी), ४५ हजार ३६० टन (मंजूर) अशी जिल्ह्यात एकूण दोन लाख ९१ हजार ९०० मे. टनाची मागणी केली आहे. त्यापैकी कृषी आयुक्तालयाकडून दोन लाख १४ हजार ३६० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. मागील हंगामातील एक लाख चार हजार ६७८ टन खतसाठा शिल्लक आहे. आतापर्यंत युरिया तीन हजार ९६६ टन, एमओपी आठ हजार २५३ टन, एसएसपी १३ हजार ९२२ टन, डीएपी आठ हजार ७८३ टन, संयुक्त खते ४६ हजार २६६ असे एक लाख ११ हजार १९० टन उपलब्ध खतापैकी सहा हजार ५१२ टन खतांची विक्री केली आहे.

तालुकानिहाय मंजूर खते

बार्शी ७०० टन, मोहोळ ४०० टन, माढा ७०० टन, माळशिरस १०० टन, करमाळा ३०० टन, पंढरपूर सहा हजार २०० टन, अक्कलकोट ४०० टन असा सुमारे आठ हजार ८०० टन खतांचा संरक्षित साठा ठेवला आहे.

नियोजित पेरणी क्षेत्र

खरीप हंगामात ज्वारी १०० हेक्टर, बाजरी ४९ हजार हेक्टर, सु. बाजरी २१ हजार हेक्टर, भात २५० हेक्टर, तूर ९५ हजार हेक्टर, मूग १९ हजार हेक्टर, उडीद ७० हजार हेक्टर, सं. मका ५५ हजार हेक्टर, भुईमूग सात हजार हेक्टर, सूर्यफूल १२ हजार हेक्टर, तीळ ५०० हेक्टर, सोयाबीन ६५ हजार हेक्टर, धेंचा ७०० हेक्टर, ताग ८०० हेक्टर अशा तीन लाख ७५ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी सांगितले.