Join us  

कृष्णा परतणार घरी; थांबवू शकेल का राया -अंतराचं लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 1:20 PM

Mann zaal Bajind: या मालिकेत नुकतंच राया आणि कृष्णाचं लग्न झालं आहे. मात्र, रायाच्या लग्नाविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. लग्नाची वरात परतत असताना कृष्णाच्या गाडीला अपघात होतो.

ठळक मुद्देराया-अंतराच्या लग्नाचे विधी सुरु असतानाच ऐन मंगलाष्टकांच्या वेळी कृष्णा हॉस्पिटलमधून घरी येते.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'मन झालं बाजिंद' (Mann zaal Bajind). या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलसं करुन घेतलं आहे. या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरातने (shweta kharat) कृष्णा ही भूमिका साकारली आहे. तर वैभव चव्हाण(vibhav chavan) रायाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत नुकतंच राया आणि कृष्णाचं लग्न झालं आहे. मात्र, रायाच्या लग्नाविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. लग्नाची वरात परतत असताना कृष्णाच्या गाडीला अपघात होतो. त्यामुळे सध्या कृष्णा मृत्यूच्या दारात उभी आहे. यामध्येच कृष्णा परतणारच नाही असं म्हणत गुली मावशी राया- अंतराचं लग्न लावायचा निर्णय घेते. परंतु, हे लग्न लागत असतानाच मालिकेत एक रंजक वळण येणार आहे.

रायाच्या लग्नाची भविष्यवाणी खरी ठरत असल्यामुळे गुली मावशी तिच्या ठरलेल्या प्लॅननुसार, राया आणि अंतराचं घरातल्या घरात लग्न लावायचा घाट घालते. एकीकडे कृष्णा मृत्यूशी झुंज देत असते. तर, राया मात्र अंतरासोबत लग्न करण्याच्या तयारी असतो. परंतु, याच वेळी कृष्णा घरी परत येते. 

दरम्यान, राया-अंतराच्या लग्नाचे विधी सुरु असतानाच ऐन मंगलाष्टकांच्या वेळी कृष्णा हॉस्पिटलमधून धावत घरी येते. त्यावेळी तिच्यासमोर राया - अंतराचं लग्न सुरु असते. कृष्णाला जखमी अवस्थेत जीवंत असल्याचं पाहून घरातील प्रत्येकालाच धक्का बसतो. तर राया पुन्हा लग्न करत असल्यामुळे कृष्णादेखील दु:खी होते. परंतु, आता कृष्णा परत आल्यामुळे राया- अंतराचं लग्न होणार की नाही हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, हे कोडं मन झालं बाजिंद ही मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना सुटणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार