वसई : अर्नाळा पोलीस ठाण्यात पोलिसांशी हुज्जत घालून दोन महिला पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हाताला चावा घेणाऱ्या दोन सख्या बहिणींना अटक करण्यात आली आहे. प्रज्ञा सिंग आणि गार्गी सिंग अशी आरोपींची नावे आहेत. काल रात्री दोन्ही बहिणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. एका इसमाने यातील एका बहिणीचा विनयभंग केल्याची फिर्यादी त्यांनी दिली होती. याप्रकरणी पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत त्यांनी पोलीस ठाण्यातच धिंंगाणा घातला. त्यावेळी मनीषा अवटी आणि जयंती राजगुरु या महिला पोलीस त्यांची समजूत घालत होते. पण, चवताळलेल्या या दोघी कुणाचेही ऐकून घेत नव्हत्या. आपल्या सांगण्याप्रमाणे तक्रार लिहून घेतलेली नाही. फिर्याद मराठीत का घेतली इंग्रजीत का घेतली नाही, असा आरोप करीत दोघांनी पोलीस ठाणे डोक्यावर घेतले होते. संतापलेल्या दोघींचा संताप अनावर झाला आणि त्यांनी जयंती आणि मनीषा यांनाच मारहाण केली. तसेच त्यांच्या हाताला चावा घेऊन जखमी केले. यानंतर पोलिसांनी प्रज्ञा आणि गार्गी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केली, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी दिली. तक्रारदार महिलेने महिला पोलिसांला चावा घेण्याची ही पहिलीच घटना आहे.
तक्रारदार बहिणी पोलिसांना चावल्या
By admin | Published: March 02, 2016 3:18 AM