शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
2
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
3
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
4
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण
5
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
6
आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?
7
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!
8
सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; रिलायन्सच्या तेजीमुळे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर; या सेक्टरचे भाव वधारले
9
सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
10
"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...
11
"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
12
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story
14
IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!
15
बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच
16
रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल 
17
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
18
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
19
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
20
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा

वसई-विरार: जागा मिळेल तिथे आहेत रिक्षा स्टॅण्ड

By admin | Published: March 03, 2016 2:02 AM

१५ हजाराहून अधिक रिक्षा असलेल्या या तालुक्यात काही अपवाद वगळता अधिकृत रिक्षा स्टँड नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी रेल्वे स्टेशनचा परिसर व्यापून टाकला आहे

शशी करपे, वसर्ई१५ हजाराहून अधिक रिक्षा असलेल्या या तालुक्यात काही अपवाद वगळता अधिकृत रिक्षा स्टँड नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी रेल्वे स्टेशनचा परिसर व्यापून टाकला आहे. तसेच शहरात नवीन वसाहती होत गेल्या तस-तसे नाका तिथे स्टँड तयार झाले. परिणामी बेकायदा रिक्षा स्टँडनी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जटील करून ठेवली आहे.विरार शहरात पश्चिमेला स्टेशनलगत पूर्वी एसटी स्टँड होते. स्टँड स्थलांतरीत झाल्यानंतर रिक्षांनी ती जागा व्यापली. पण, रेल्वे स्टेशन वाढत गेल्यानंतर रिक्षा स्टँडची जागा कमी होऊन रिक्षा थेट रस्त्यावर आल्या आहेत. पूर्वेला तर रस्ता अपुरा असतानाही तिथे दोन्ही बाजूला रिक्षा स्टँड तयार झाले. त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेला स्टेशनलगत रिक्षांच्या गर्दीने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण केला आहे. नालासोपारा स्टेशन परिसरातही तिच स्थिती आहे. पश्चिमेला जागा नसल्याने उड्डाणपूलाखालची जागा रिक्शा चालकांनी व्यापून टाकली आहे. त्यामुळे मुख्य रस्ता गायब झाला आहे. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली आहे. पूर्वेला उड्डाणपूलाखालची जागा रिक्षा स्टँडसाठी होती. ती अपुरी पडत असतानांच आता महापालिकेच्या परिवहन सेवेने जागा व्यापली आहे. पलिकडे स्टेशनलगत रिक्षा स्टँड होते. पण, एका नगरसेवकांने रेल्वेच्या ताब्यात असलेली जागा वडिलोपार्जित असल्याचा दावा करून तेथील रिक्षा स्टँड हटवून त्या जागेचा ताबा घेतला आहे. त्यामुळे पूर्वेला थेट मुख्य रस्त्यावर रिक्षा उभ्या राहू लागल्याने वाहतूक कोंडीने लोकांना त्रस्त केले आहे. सहा वर्षे उलटली तरी सिग्नल नाहीपालिका निर्माण होऊन सहा वर्षे उलटून गेली असून अद्याप सिग्नल उभारलेले नाहीत. शहरातील अनेक भागातील मुख्य रस्ते इतके अरुंद आहेत की गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणा कशी कार्यान्वित होणार? हा प्रश्न निर्माण होतो. अधिकृत रिक्षा स्टँड करण्यात पोलीस आणि पालिका प्रशासन यशस्वी होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणे अवघड होणार आहे. मध्यंतरी आरटीओकडून तालुक्यातील १५० ठिकाणांचा स्टँडसाठी सर्व्हे देखील करण्यात आला आहे. पण, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कसे करणार? नव्या स्टँडसाठी पुरेशी जागा कशी उपलब्ध होणार हा खरा प्रश्न आहे. थेट मुख्य रस्त्यावर अतिक्रमणवसई रोड रेल्वे परिसरातही अशीच स्थिती आहे. पश्चिमेचा रिक्षा स्टँड स्टेशनचा कायापालट झाल्याने आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रिक्षांनी थेट मुख्य रस्ता व्यापून टाकला असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच आता महापालिका परिवहनचा थांबा मुख्य रस्त्यावर आल्याने स्टेशनला जोडणारा मुख्य रस्ता रिक्षा आणि बसेसपुरताच उरला आहे. त्यांच्या गर्दीतून वाट काढत चालणे देखील जिकीरीची होऊन बसले आहे. पूर्वेची परिस्थिती तर खूपच भयावह आहे. रिक्षा स्टँड आणि परिवहन सेवेच्या बसेसनी रस्ता व्यापून टाकला आहे.