शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

नायगाव खाडीपूल, वसई समुद्रातील गॅस; दोन्ही प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे

By admin | Published: June 29, 2015 4:31 AM

नायगांव खाडीवरील जुन्या रेल्वे पूलावरून हलक्या वाहनांना वाहतुकीची परवानगी व वसईच्या समुद्रातील गॅस स्थानिकांना उपलब्ध करणे असे दोन महत्वाचे प्रश्न आता लवकरात लवकर सुटणे गरजेचे आहेत.

दीपक मोहिते, वसईवसई-विरार उपप्रदेशात भार्इंदर नायगाव दरम्यान असलेल्या नायगांव दरम्यान असलेल्या नायगांव खाडीवरील जुन्या रेल्वे पूलावरून हलक्या वाहनांना वाहतुकीची परवानगी व वसईच्या समुद्रातील गॅस स्थानिकांना उपलब्ध करणे असे दोन महत्वाचे प्रश्न आता लवकरात लवकर सुटणे गरजेचे आहेत. या दोन्ही प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पूलासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक निधी उपलब्ध केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली तर पालघरचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी सतत पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून वसई समुद्रातील गॅस स्थानिकांना देण्यास मंजूरी मिळवली. या दोन्ही प्रकल्पामुळे उपप्रदेशाच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणत उपलब्ध होऊ शकतील. नायगाव खाडीवरील पुलामुळे इंधन, वेळ व पैशाची बचत होणार आहे. सध्या वसई विरारकरांना मुंबई शहर गाठण्यासाठी रेल्वे व मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग असे दोनच पर्याय आहेत. रेल्वे ठप्प झाली की राष्ट्रीय महामार्गशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाहीत. अशावेळी महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता अन्य पर्याय निर्माण होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन गेली ८ वर्षे या प्रश्नाचा सतत पाठपुरावा करण्यात येत होता, परंतु त्याकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध होत नव्हता. अखेर मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाने आपले क्षेत्र विकसित केले व आशेचा किरण दिसू लागला. अखेर निधीचा मुुद्दा मार्गी लागला. त्यामुळे आता प्रत्यक्षात कामाला सुरूवात होऊन हा पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी वसई-विरारकरांची अपेक्षा आहे.दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे वसईच्या समुद्रातील गॅस हा अन्य प्रदेशाकडे पाठवण्यात येतो. हा गॅस पाईपलाईद्वारे उपप्रदेशातील नागरिकांना मिळावा तसेच या गॅसवर औद्योगिक प्रकल्प उभारून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी मागणी ७ वर्षापूर्वी आ. हितेंद्र ठाकूर यांनी तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारकडे केली होती. त्यानंतर पक्षाचे खासदार निवडून आल्यानंतर त्यांनी या मागणीचा जोरदार पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन खा. बळीराम जाधव यांन केंद्रीय पेट्रोलियम खात्याच्या सचिवांसमवेत वेळोवेळी चर्चा केली अखेर गेल्या महिन्यात केंद्रीय पेट्रोलियम सचिव कृष्णन यांनी पत्र पाठवून मागणी मान्य करीत असल्याचे कळवले. त्यामुळे आता हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हे ते प्रकल्प पूर्ण झाल्यास उपप्रदेशाच्या विकासाला वेग येईल व बेरोजगारांना रोजगाराच्या संधी नक्कीच उपलब्ध होऊ शकतील.