शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
2
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
3
"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान
4
Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या
5
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
7
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
8
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
9
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
10
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
11
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
12
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
13
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
14
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
15
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
16
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
17
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
18
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
19
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
20
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती

अखेर पालकमंत्री बदलले

By admin | Published: December 30, 2016 12:06 AM

जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे असल्याने पालकमंत्रीही भाजपाचाच द्यावा,

मदन येरावारांकडे जिल्ह्याची धुरा : संजय राठोडांकडे वाशिम यवतमाळ : जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे असल्याने पालकमंत्रीही भाजपाचाच द्यावा, ही मागणी दोन वर्षानंतर का होईना प्रत्यक्षात साकारली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ऊर्जा व बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांची वर्णी लावण्यात आली. गुरुवारी सायंकाळी या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले. गेली दोन वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळणाऱ्या महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे लगतच्या वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्रीपदी बदल करताना ‘सहपालकमंत्री’ हे पद निर्माण करण्यात आले आहे. यवतमाळात आता ना. येरावार हे पालकमंत्री तर ना. संजय राठोड हे सहपालकमंत्री राहणार आहे. या उलट क्रम वाशिममध्ये राहील. तेथे ना. राठोड पालकमंत्री तर ना. मदन येरावार सहपालकमंत्री राहणार आहे. वाशिमची अतिरिक्त जबाबदारी आतापर्यंत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे होती. मुख्यमंत्री गुरुवारी कळंबच्या दौऱ्यावर आले होते. येथून मुंबईत परतताच नव्या पालकमंत्र्यांची यादी जारी करण्यात आली. ते पाहता कळंबमध्येच पालकमंत्री बदलाचे राजकारण शिजले असावे, असा तर्क राजकीय गोटात लावला जात आहे. निवडणुकीसाठी ‘बुस्ट’ फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना. येरावार यांना मिळालेले पालकमंत्रीपद म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ‘जिल्ह्यात भाजपाला बुस्ट’ दिल्याचे मानले जाते. या पालकमंत्रीपदाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत गतवेळ पेक्षा अधिक जागा खेचून आणण्याची जबाबदारी ना. येरावार आणि पक्षाच्या अन्य चार आमदारांवर वाढली आहे, एवढे निश्चित. भाजपा कार्यकर्ते सुखावले एकमेव आमदार असताना शिवसेनेला जिल्ह्याचे पालकमंत्री पद कसे ? असा प्रश्न उपस्थित करीत मदन येरावार यांनी सुरुवातीपासूनच ‘चेंज’चा नारा दिला होता. त्यांना जिल्ह्यातील आमदारांचीही साथ लाभली. भाजपाच्या या मंत्री-आमदारांकडून दबाव वाढल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनाही पालकमंत्री पदावरील हा फेरबदल अधिककाळ टाळता आला नाही. गुरुवारी ना. मदन येरावार यांच्या नावावर यवतमाळच्या पालकमंत्री पदाची मोहर उमटविण्यात आली. या बदलामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर शिवसैनिकांमध्ये काहीसा निरुत्साह पहायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) युतीचा फॉर्म्युला फेल जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलाची चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली असता ना. संजय राठोड यांनी हा बदल अशक्य असल्याचे सांगताना युतीचा फॉर्म्युला पुढे केला होता. सरकार स्थापनेच्यावेळी पालकमंत्री म्हणून भाजपा आणि शिवसेनेचे जिल्हे निश्चित झाले आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही, त्यामुळे पालकमंत्री बदलाच्या चर्चा ना. राठोड यांनी निरर्थक ठरविल्या होत्या. परंतु गुरुवारी झालेला ‘चेंज’ पाहता युतीचा कथीत फॉर्म्युलाच निरर्थक ठरल्याचे दिसून येते.