शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
4
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
5
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
6
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
7
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
8
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
9
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
10
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
11
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
12
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
13
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
14
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
16
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

सोसायटीचे ८६ कोटींपैकी केवळ २५ लाख कर्ज वसूल

By admin | Published: December 30, 2016 12:16 AM

तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटींच्या माध्यमातून वितरित केलेल्या ८६ कोटी रुपयांच्या कर्जापैकी केवळ २५ लाख रुपयेच वसुली झाली आहे.

नोटबंदीचा परिणाम : महागावातील २८ सोसायट्यांचे भविष्य अंधकारमय संजय भगत   महागाव तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटींच्या माध्यमातून वितरित केलेल्या ८६ कोटी रुपयांच्या कर्जापैकी केवळ २५ लाख रुपयेच वसुली झाली आहे. वसुलीचा हा निच्चांक केवळ नोटबंदीमुळे असल्याचे सांगितले जात आहे. आता वसुलीच नसल्याने आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना नवीन कर्ज कसे द्यावे, असा प्रश्न सोसायट्यांपुढे उभा राहिला आहे. दुसरीकडे तालुक्यातील २८ सोसायट्यांचे भविष्यही अंधकारमय होणार आहे. महागाव तालुक्यात २८ विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून चालू हंगामात १२ कोटी ११ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. त्यापैकी केवळ ३५ सभासदांनी चालू कर्जाचे १९ लाख ५३ हजार आणि थकित म्हणून पाच लाख ४७ हजार असे २५ लाख ५४ हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. वसुली उद्दीष्ट येत्या मार्चपर्यंत गाठता आला नाही तर येणाऱ्या खरीप हंगामावर त्याचा परिणाम पडणार आहे. चालू कर्जाला सहा तर थकित कर्जाच्या रकमेला १३ टक्के व्याजाचा भुर्दंड एप्रिल महिन्यापासून पडणार आहे. साधारणत: २० हजार शेतकऱ्यांना नोटबंदीचा फटका बसला असून, सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहे. जुन्या नोटांच्या चलनबंदीचा परिणाम आता सर्वत्र जाणवू लागला आहे. जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्याची बंदी आहे. त्यामुळे आता वसुलीसुद्धा होत नाही. वसुली थकल्यामुळे त्याचा थेट परिणाम येत्या खरीप हंगामात बसणार असून, तोपर्यंत सोसायट्यांची आर्थिक नाकेबंदी झालेली आहे. हा तिढा कसा आणि केव्हा सुटणार याची काहीच शाश्वती दिसत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेचे संपूर्ण आर्थिक चक्र थांबले आहे. सोसायट्यांची समस्या आणि भविष्यातील शेतकऱ्यांना बसणारी झळ याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवार होणार आहे. (शहर प्रतिनिधी) बँकेतून निघतात केवळ दोन हजार रुपये नोटाबंदीचा निर्णय सुरूवातीला चांगाला वाटत होता. आता पन्नास दिवस उलटल्यानंतरही काहीच सुधारणा झालेली दिसत नाही. शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचे पैसे थेट बँकेत जमा होतात. बँकेतून दोन हजार रुपयांच्यावर पैसे निघत नाहीत. ही वस्तुस्थिती आता शेतकऱ्यांना अनुभवायला मिळत आहे. जिल्हा बँकेत ऊस व कापसाचे पैसे जमा होत असून, जिल्हा बँकेतून आरटीजीएस करून नॅशनलाईज बँकेत जमा करून घेतल्या जात आहेत. परंतु दोन-चार हजार रुपयाचे वर पैसे दिल्या जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे घरी लग्न कार्य किंवा ओलितासाठी खरेदी करणाऱ्याच्या शेती उपयोगी साहित्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली.