राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान प्रवास नाकारला?, अजित पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:41 PM2021-02-11T13:41:50+5:302021-02-11T13:48:30+5:30

Ajit Pawar : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

ajit Pawar Replay On Bhagat Singh Koshyari denied Permission To Air Travel | राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान प्रवास नाकारला?, अजित पवार म्हणतात...

राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान प्रवास नाकारला?, अजित पवार म्हणतात...

Next

महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता भगतसिंग कोश्यारी यांना ठाकरे सरकारकडून विमान प्रवास नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आलं असता त्यांनी या घटनेबाबत कोणतीही माहीती आपल्यापर्यंत आलेली नसल्याचं सांगितलं आहे. (Ajit Pawar Replay On Bhagat Singh Koshyari denied Permission To Air Travel)

नवा वाद! राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरावं लागलं!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियोजित दौऱ्यानुसार आज उत्तराखंडसाठी रवाना होणार होते. पण सरकारी विमानात बसल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप त्यांच्या विमान प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचं कळालं. त्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरावं लागलं आणि पुन्हा राजभवनात परतावं लागल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलं असता "मला या घटनेबाबत कोणतीही माहिती नाही. मी आता इथून मंत्रालयात जाणार आहे. तिथं गेल्यावर याबाबतची माहिती घेईन त्यानंतर बोलेन", असं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

"राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल": सुधीर मुनगंटीवार

"राज्याच्या राज्यपालांशी निगडीत घटनेवर राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून बोलत असताना संपूर्ण माहिती घेऊनच बोलणं योग्य आहे. ज्या घटनेबाबत मला कोणतीही माहिती अद्याप नाही. त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. मंत्रालयात गेल्यावर याबाबत माहिती घेईन", असं अजित पवार म्हणाले. 

राज्यपालांसोबत नेमकं काय घडलं?
उत्तराखंडमधील मसूरी येथे लालबहादुर शास्त्री अकादमीच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित राहणार होते, त्यासाठी राज्यपाल सरकारी विमानाने मुंबई विमानतळावरून रवाना होणार होते, तत्पूर्वी सरकारी विमान वापरण्यासाठी राजभवनाकडून रितसर सामान्य विभाग प्रशासनाला परवानगीसाठी कळवण्यात आलं होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ही परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांसह राजभवनाचे अधिकारी १५ मिनिटं विमानात बसून होते, तरीही परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल विमानातून उतरले, त्यानंतर राज्यपालांसाठी स्पाइस जेटचं व्यावसायिक विमानाची व्यवस्था करण्यात आली, १२.१५ मिनिटांनी त्यांचे विमान देहरादूनसाठी रवाना झालं, देहरादूनपर्यंत राज्यपाल विमानाने प्रवास करतील त्यापुढे मसूरीपर्यंत राज्यपाल वाहनाने जातील, आणि उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी माहिती लोकमत ऑनलाइनच्या सूत्रांनी दिली आहे. 

मात्र या घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण याची चर्चा सध्या सुरू आहे, कारण सामान्य प्रशासन विभाग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अख्यारित येते, तसेच राजशिष्टाचार विभागाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे आहे, त्यामुळे विरोधकांनी आता सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट करण्यात सुरुवात केली आहे. 

Web Title: ajit Pawar Replay On Bhagat Singh Koshyari denied Permission To Air Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.