पावसाचा जोर कायम

By admin | Published: August 27, 2014 11:07 PM2014-08-27T23:07:44+5:302014-08-27T23:08:15+5:30

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात गेल्या सोमवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम होता़

Rainfall persists | पावसाचा जोर कायम

पावसाचा जोर कायम

Next

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात गेल्या सोमवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम होता़ जिल्ह्यात मंगळवारी ११ मि़मी़ पाऊस झाला असून, बुधवारी मुसळधार पावसाने नगरकरांना झोडपून काढले़
गेल्या दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ गेल्या सोमवारी सायंकाळी प्रथमच १४० मि़मी़ पाऊस झाला़ पारनेर वगळता सर्वत्र हा पाऊस झाला असून, संगमनेर व श्रीरामपूर शहरात सर्वाधिक पाऊस झाला़ दुसऱ्या दिवशी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ११़ ९७ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ राहुरी तालुक्यांत सर्वाधिक ४२़४ मि़ मी़ पाऊस झाला़ नगर तालुक्यातही ३२ मि़मी़ पाऊस झाला असून, कोपरगाव परिसरात ३३ मि़ मी़ पाऊस झाला आहे़याशिवाय शेवगाव, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यांत मंगळवारी पाऊस झाला़ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे़ तिसऱ्या दिवशी बुधवारीही नगर शहरासह तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला आहे़पावसाचा जोर वाढत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे़
शहरात दुपारी मुसळधार पाऊस झाला़ शहरातील सावेडी, बालिकाश्रम रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोठला, सर्जेपुरा, माळीवाडा, सारसनगर, केडगाव, नालेगाव, गुलमोहर रस्ता, निर्मलननगर, महापालिका कार्यालय परिसर, मुकुंदनगर परिसरात मुसळधार पाऊस झाला़ याशिवाय जिल्ह्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे़ पावसाचा जोर वाढतच असून, बुधवारी राहुरी तालुक्यातील गुहा सोनगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला़
मुळा लाभ क्षेत्रातील खरीप पिकांसाठी सुरू झालेले आवर्तनही पावसामुळे बंद करण्यात आले आहे़ लाभक्षेत्रात काही ठिकाणी झालेल्या पावसाचा आढावा घेऊन पाटबंधारे विभागाने आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे़
पावसामुळे मुळाचे दोन्ही कालवे बंद
१मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या तीन दिवसांत समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने शेतीसाठी सोडलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे. मुळाचा उजवा व डावा असे दोन्ही कालवे बंद झाल्याने ६००० दशलक्ष घनफूट पाणी वाचणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
२खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांच्या मागणीवरून मुळा धरणाचे आवर्तन गेल्या तीन दिवसांपूर्वी सोडले होते. परंतु त्यानंतर लगेच लाभक्षेत्रावर वरूणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने पिकांचे भरणे आपोआप झाले. परिणामी दोन्ही कालवे बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला़
३२६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात बुधवारी रात्री २०६२५ दलघफू पाणी साठ्याची नोंद झाली़ धरणाकडे २२४७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. पाणलोट क्षेत्रावर गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़ बुधवारी दुपारी पाणलोट क्षेत्रावर पाऊस सुरू होता़ सायंकाळीही हलक्या सरी पडल्या. कोतूळ येथे ९, तर मुळानगर येथे ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ ३० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज महात्मा फु ले कृषी विद्यापीठाचे हवामान विभाग प्रमुख डॉ़ रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केला़
जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घट
पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे़ पाऊस झालेल्या परिसरातील टँकर बंद करण्यात आले आहेत़ मागील आठवड्यात ३३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होता़ सोमवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे विविध गावांतील टँकर कमी करण्यात आले असून,टँकरची संख्या २८० झाली आहे़ नुकत्याच झालेल्या पावसामुळे ५३ टँकर कमी झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे़
कुठे किती पाऊस
अकोले- ९ संगमनेर-१, कोपरगाव-३३, राहुरी- ४२़२, नेवासा- १, नगर- ३२, शेवगाव- १२, पाथर्डी- १६, पारनेर- १३, कर्जत- २, जामखेड- ६़२

Web Title: Rainfall persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.