अकोलेकरांनो, ‘स्क्रब टायफस’पासून राहा सावध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:20 AM2021-09-19T04:20:43+5:302021-09-19T04:20:43+5:30

पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात झुडपांचे प्रमाण वाढते. याच दिवसांत गवत, झुडपांमध्ये किटकांचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे या दिवसांत किटकांपासून ...

Akolekars, beware of ‘scrub typhus’! | अकोलेकरांनो, ‘स्क्रब टायफस’पासून राहा सावध!

अकोलेकरांनो, ‘स्क्रब टायफस’पासून राहा सावध!

Next

पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात झुडपांचे प्रमाण वाढते. याच दिवसांत गवत, झुडपांमध्ये किटकांचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे या दिवसांत किटकांपासून होणाऱ्या स्क्रब टायफसचादेखील धोका वाढलेला असतो. गवतावरील चिगर माइट कीटक चावल्याने ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ नावाचे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ‘स्क्रब टायफस’ हा आजार होतो. विदर्भात नागपूर जिल्ह्यात स्क्रब टायफसची एंट्री झाली असून, मागील काही दिवसांत सुमारे सात रुग्ण आढळल्याची माहिती आहे. त्यामुळे वेळीच खबरदारी घेत अकोलेकरांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

२०१८ मध्ये विदर्भात घातला होता धुमाकूळ

तीन वर्षांपूर्वी विदर्भात स्क्रब टायफसच्या रुग्णांची लक्षणीय संख्या आढळून आली होती. गवत किंवा झुडपात आढळणारे ट्रॉम्बिक्युलीड माइटचे लारव्हे म्हणजेच पिसवा, चिगर किंवा सूक्ष्म कीटक चावल्यामुळे ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ नावाचे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात व स्क्रब टायफसची लागण होते.

ही आहेत सामान्य लक्षणे

सूक्ष्म कीटक चावल्यानंतर सुमारे पाच ते वीस दिवसांत या आजाराची लक्षणे दिसतात.

सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, उलटी आदी लक्षणे दिसतात.

त्यामुळे अनेक रुग्णांमध्ये मलेरिया किंवा डेंग्यूची शक्यता वर्तवली जाते.

चिगर ज्या ठिकाणी चावतो, तेथे एक व्रण दिसतो.

डीडीटी पावडरची फवारणी आवश्यक

पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात अनेक भागात गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे विविध आजाराला कारणीभूत असलेल्या कीटकांचाही धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी गवत आणि झुडपांवर डीडीटी पावडरची फवारणी करण्याची गरज आहे.

Web Title: Akolekars, beware of ‘scrub typhus’!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.