मालवाहू व कारचा अपघात; दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:23 AM2021-09-05T04:23:08+5:302021-09-05T04:23:08+5:30

बोरगाव मंजू : अकोला ते म्हैसाग मार्गावर कट्यार बसथांब्यानजीक मालवाहू व कारची धडक झाल्याने अपघातात दोन जण ठार झाल्याची ...

Cargo and car accidents; Two killed | मालवाहू व कारचा अपघात; दोन जण ठार

मालवाहू व कारचा अपघात; दोन जण ठार

Next

बोरगाव मंजू : अकोला ते म्हैसाग मार्गावर कट्यार बसथांब्यानजीक मालवाहू व कारची धडक झाल्याने अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना शनिवार, दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. अपघातात दोन्ही वाहनाच्या चालकांचा मृत्यू झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्याहून म्हैसागकडे सिलिंडर वाहून नेत असलेला मालवाहू क्रमांक (एमएच ३०, बीडी ०३४५) जात होता, तर दर्यापूरहून अकोल्याकडे कार क्रमांक (एमएच ३८ ५७२७) येत होती. कट्यार येथील बसथांब्यानजीक दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांचे चालक अडकून पडले होते. या अपघातात कारचा चालक ज्ञानेश्वर रवींद्र खेळकर (२९) (रा. खामगाव) याचा मृत्यू झाला, तर कारमधील प्रवासी जागृत मोमाया, स्नेहा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मालवाहूचा चालक अब्दुल जुबेर अब्दुल शरीफ (३२) (रा. दहीहांडा) याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके, हेड कॉन्स्टेबल अब्दुल फईम शेख, प्रकाश कोकरे, संजय इंगळे, गिरीश वीर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील जखमीवर उपचार सुरू आहेत. वृत्त लिहिस्तोवर पोलीस दफ्तरी गुन्हा दाखल केला नव्हता, पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंकेसह पोलीस करीत आहेत.

Web Title: Cargo and car accidents; Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.