CoronaVirus: अकोला जिल्ह्यात १४ मृत्यूची लपवाछपवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:04 AM2020-06-19T10:04:05+5:302020-06-19T10:04:20+5:30

अकोल्यात १४ मृत्यूची माहिती लपविण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने एकच खळबळ उडाली.

CoronaVirus: 14 deaths concealed in Akola district? | CoronaVirus: अकोला जिल्ह्यात १४ मृत्यूची लपवाछपवी?

CoronaVirus: अकोला जिल्ह्यात १४ मृत्यूची लपवाछपवी?

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोला जिल्ह्यात दररोज सरासरी एकाचा कोरोनामुळे बळी जात आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोना मृत्यूचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याच्या पृष्टर्थ त्यांनी सरकारचा हवाला देत बुधवारी एक टिष्ट्वट केले. त्यानुसार अकोल्यात १४ मृत्यूची माहिती लपविण्यात आल्याचा दावा त्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली.
राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाने राज्याची आरोग्य यंत्रणाच अडचणीत आली होती. दरम्यान, शासनानेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यावर त्यामध्ये वाढलेला मृतकांचा आकडा हा लपविलेला होता, असा दावा करीत फडणवीस यांनी जिल्हानिहाय आकडेवारी टिष्ट्वट केल्याने सध्या आकड्यांचा खेळ रंगला आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर यांच्या मार्गदर्शनानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मृत्यूची समीक्षा करणाऱ्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला जिल्हा स्तरावर रुग्णाच्या मृत्यूचे आॅडिट सात दिवसांच्या आत करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये रुग्णाच्या मृत्यूच्या कारणांचा सविस्तर शोध घेणे, रुग्णांच्या मृत्यूचे तत्कालिन कारण कोविड-१९ नसल्यास तसे नमूद करणे आवश्यक आहे. अशा रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे गृहीत धरण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे त्यामुळे प्रशासनाने फेरतपासणीच्या नावाखाली लपविलेले आकडेच समोर केल्याचा आरोपही त्यांनी या टिष्ट्वटच्या माध्यमातून केला.
सरकारचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये अकोला जिल्ह्यातील १४ मृत्यू लपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या दाव्यामुळे अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कुठलीही सुधारित माहिती नसल्याचे सुत्रांनी सांगीतले.

जिल्ह्यात आतापर्यंत ५८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. या सर्व मृत्यूची नोंद योग्य पद्धतीने करण्यात आली असून, तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नव्याने दाखविण्यात येणाºया त्या १४ मृत्यूची नोंददेखील यापूर्वीच करण्यात आली असून, त्यांचा समावेश ५८ मध्येच आहे.
- डॉ. रियाज फारुकी,
आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ

Web Title: CoronaVirus: 14 deaths concealed in Akola district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.