आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थानिक समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:13+5:302021-07-14T04:16:13+5:30

अमरावती : कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय नुकताच शिक्षण ...

The decision to start classes from eighth to twelfth is up to the local committee | आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थानिक समितीवर

आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थानिक समितीवर

Next

अमरावती : कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय नुकताच शिक्षण विभागाने जारी केला. ज्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करायचे आहेत. संबंधित गावात किमान महिनाभर आदीपासून एकही कोरोना बाधित नसावा, ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे मार्गदर्शनात शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गावांनी कोरोना निकषाच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने यावर सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. यात कुणीही कुचराई करू नये, अशा सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्रात दिल्या आहेत.

बॉक्स

समितीत यांचा समावेश

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची सूचना केली आहे. त्या समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच, सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच निमंत्रित सदस्य म्हणून वैद्यकीय अधिकारी सदस्य, सचिव, ग्रामसेवक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश असेल.

बॉक्स

नव्याने घेतलेला निर्णय

दोन दिवसापूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणेबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून बुधवारी पुन्हा नव्याने आठवी व बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. यावेळी शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

बॉक्स

‘चला मुलांनो शाळेत चला‘ मोहीम

शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावले जावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिले आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बेंचमध्ये सहा फुटांचे अंतर. एका वर्गात कमाल १५ ते २० विद्यार्थी असावे तसेच चला मुलांनो शाळेत चला ही मोहीम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Web Title: The decision to start classes from eighth to twelfth is up to the local committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.