३६ हजार शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात

By admin | Published: November 10, 2015 12:29 AM2015-11-10T00:29:33+5:302015-11-10T00:29:33+5:30

बलिप्रदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रदेलाच दिवाळीची उपमा आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़

Diaspora families of 36 thousand farmers in the dark | ३६ हजार शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात

३६ हजार शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात

Next

सोयाबीन गेले : सावकारांनीही मदत नाकारली
धामणगाव रेल्वे : बलिप्रदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रदेलाच दिवाळीची उपमा आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़ पूर्व भागात केवळ एकरी एक पोतं सोयाबीन घरी आल्याने मागील वर्षाचे सावकाराचे मशागतीसाठी घेतलेले पीककर्ज परत करण्याची अवस्था शेतकऱ्याकडे नसल्यामुळे या सावकारांनी दिवाळीसाठी मदतही नाकारली आहे़
जिल्ह्यात सर्वाधिक फटका यंदा खरीप हंगामात धामणगाव तालुक्याला बसला आहे़ अल्प पावसामुळे दरवर्षी एकरी ८ ते १० पोते सोयाबीन घेत असत. यंदा तर शेतातील सोयाबीन काढणे अवघड झाले आहे़ हार्वेस्टरने सोयाबीन काढल्यानंतर एका एकरात केवळ एक पोतं सोयाबीन निघाले. त्यामुळे हार्वेस्टरचा खर्च देणेही परवडनासे झाले असल्याची माहिती दिघी येथील अनुभवी शेतकरी अरूण महल्ले यांनी दिली़ एका एकराकरिता तब्बल १५ ते २० हजार खर्च सोयाबीनसाठी आला असताना एक किंवा दोन पोते सोयाबीन घरी आणल्यानंतर मागील वर्षाचे सावकरांचे कर्ज द्यावे की बँकेची परतफेड करावी किंवा दिवाळी साजरी करावी, असा प्रश्न महल्ले यांनी या भागातील शेतकऱ्यांच्यावतीने उपस्थित केला आहे़
चणा, गहू बियाणे
मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा
अल्प पावसामुळे घरात सोयाबीन आले नाही़ खरीप हंगाम हातातून गेला. आता रबी हंगामाकरिता शेतात प्रथम तणनाशक मारणे गरजेचे आहे़ तद्नंतर व्ही-पास व रोटावेटर फिरविण्याचा खर्च अधिक येतो़ एकरी ३० किलो हरभरा २ हजार रूपये, पेरणी दीड हजार, शेतीची मशागत २ हजार व खताचा खर्च असा ६ हजार रूपये एकरी खर्च येत असून गहू पिकासाठी यापेक्षा जास्त खर्च येतो. खरीप हंगामात हातात काहीच न आल्यामुळे गहू व चणा बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे़
जुन्याच कपड्यावर करणार
दिवाळी साजरी
घरी दोन एकर शेती केवळ तीन पोते सोयाबीन घरी आले़ या पिकाने पूर्ण दगा दिला आहे़ दरवर्षी दिवाळीच्या आठ दिवसांपूर्वी मुलांसाठी कपडे खरेदी करण्याची घाई होती़ मोठा आनंद साजरा करण्यात येत होता़ परंतु यंदा निर्सगाच्या चक्रव्यूहामुळे हातात पीक आले नाही घरी फराळाचे सोडा साधा दिवाळीसाठी किराणा आणण्याची सोय नाही, दिवा कसा पेटवायचा याची चिंता आहे़ त्यामुळे यंदा काळजाच्या तुकड्याची दिवाळी जुन्याच कपड्यावर साजरी करण्याची वेळ आली आहे़

Web Title: Diaspora families of 36 thousand farmers in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.