राज्यात आता २३ व्या वर्षांपर्यत अनाथालयात वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:11 AM2021-05-24T04:11:37+5:302021-05-24T04:11:37+5:30

(गणेश वासनिक) महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय, हा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य. अमरावती : अनाथ मुले १८ ...

Now living in an orphanage in the state till the age of 23 | राज्यात आता २३ व्या वर्षांपर्यत अनाथालयात वास्तव्य

राज्यात आता २३ व्या वर्षांपर्यत अनाथालयात वास्तव्य

Next

(गणेश वासनिक)

महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय, हा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य.

अमरावती : अनाथ मुले १८ वर्षांची झाली की, त्यांना ते राहत असलेल्या अनाथ आश्रमात राहू दिले जात नाही. या वयात ही मुले-मुली आपल्या पायांवर उभीदेखील झालेली नसतात. यामुळे अनाथ मुला-मुलींचे वय २३ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना आश्रमात राहता येईल, असा निर्णय राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने घेतला. हा क्रांतिकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

अनाथ मुला-मुलींना वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत राहू द्यावे, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांची होती. त्याअनुषंगाने राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेत अनाथ मुला-मुलींना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे अनाथालय संचालित करणाऱ्या चालकांना मोठा दिलासा मानला जात आहे.

कोविड-१९ आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. राज्यात कोविडमुळे आतापर्यंत १९५ मुले अनाथ झाली आहेत, आई व वडील गमावलेली १०८ बालके, तर एक पालक गमावलेली ८७ बालके आहेत.

-------------------

कोविडमुळे एकूण अनाथ

१९५ मुले

एक पालक गमावलेली - ८७ मुले

दोन्ही पालक गमावलेली - १०८ मुले

--------------------

सगळ्यात जास्त अनाथ मुले -

नंदुरबार - ९३

हिंगोली - १८

जालना - १६

गोंदिया - १२

ठाणे - ११

-----------------

या जिल्ह्यातही अनाथ झाली मुले

पालघर - ०२

रत्नागिरी - ०२

परभणी - ०४

सिंधुदुर्ग - ०२

पुणे - ०४

धुळे - ०३

जळगाव - ०७

अहमदनगर - ०८

वाशिम - ०२

यवतमाळ - ०१

बुलडाणा - ०३

नागपूर - ०७

-------------------------

कोविडच्या काळात मुले, महिलांचे प्रचंड हाल झाले. काही मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरविले. त्यामुळे अशा मुलांचे जिल्हास्तरावर टास्क फोर्सच्या माध्यमातून संगोपन, समुपदेशन करण्यात येणार आहे. अनाथालयात २३ वर्षांपर्यंत मुले राहू शकतील, असा निर्णय घेतला आहे.

- यशेामती ठाकूर, महिला व बाल कल्याण मंत्री,

Web Title: Now living in an orphanage in the state till the age of 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.