वीज कोसळून दोन शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:54+5:302021-07-14T04:16:54+5:30

धामणगाव रेल्वे-बडनेरा : अमरावती जिल्ह्यात २४ तासांत दोन शेतकऱ्यांचा अंगावर वीज कोसळल्याने शिवारातच मृत्यू झाला. त्यापैकी वडगाव राजदी शिवारात ...

Two farmers killed in lightning strike | वीज कोसळून दोन शेतकरी ठार

वीज कोसळून दोन शेतकरी ठार

Next

धामणगाव रेल्वे-बडनेरा : अमरावती जिल्ह्यात २४ तासांत दोन शेतकऱ्यांचा अंगावर वीज कोसळल्याने शिवारातच मृत्यू झाला. त्यापैकी वडगाव राजदी शिवारात रविवारी शेतकरी फवारणी करीत होता, तर शेतकरी महिला सोमवारी भानखेडा खुर्द शिवारात निंदणासाठी गेली होती.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदी शिवारात रविवारी दुपारी एक वाजता वीज अंगावर कोसळल्याने ४० वर्षीय शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाला.

अनिल विठ्ठल दाभेकर (४०, रा. तिवरा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते तिवरा येथील रहिवासी होते. ते रविवारी सकाळपासून अन्य एका शेतकऱ्याच्या शेतात ते फवारणीसाठी गेले होते. दुपारी १ वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने या भागात हजेरी लावली. त्यात अंगावर वीज कोसळल्याने अनिल दाभेकर जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई व दोन मुले असा आप्तपरिवार आहे. तिवरा येथील सरपंच ज्योत्स्ना किशोर निसार यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. चांदूर रेल्वे पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी तिवरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

दरम्यान, .......................................... श्यामकांत सहस्त्रभोजने यांच्याकडून माहिती येत आहे.

Web Title: Two farmers killed in lightning strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.