तीन महिन्यानंतरही मांजरा धरणात केवळ ३१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:58+5:302021-09-06T04:37:58+5:30

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह धारूर, केज, कळंब, मुरुड, लातूर व लातूर एमआयडीसी आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या ...

Even after three months, only 31% water is stored in Manjara dam | तीन महिन्यानंतरही मांजरा धरणात केवळ ३१ टक्के पाणीसाठा

तीन महिन्यानंतरही मांजरा धरणात केवळ ३१ टक्के पाणीसाठा

Next

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह धारूर, केज, कळंब, मुरुड, लातूर व लातूर एमआयडीसी आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यात फक्त ३० दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रात आणखी मोठ्या पावसाची गरज असून प्रकल्पात फक्त ३१.८३ टक्के इतका जिवंत साठा आहे.

या वर्षी पावसाळ्यात सर्वत्र मोठा पाऊस झाला. तीन महिने लोटली तरी मांजरा धरणाचा पाणीसाठा वाढलेला नाही. मांजरा प्रकल्पावर अनेक मोठी शहरे आणि गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शिवाय, मांजरा प्रकल्प क्षेत्रांतर्गत मोठे पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत प्रकल्पाची पाणी पातळी ६३८. ३३०मीटर आहे. सर्व शहरांसाठी प्रति महिना ३ दलघमी पाणी उचलले जाते. अंबाजोगाई शहरात किमान आठ दिवसाआड पाणी देण्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची गरज आहे. २०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने दोनदा भरले आहे. यावर्षी ऑगस्ट खेर फक्त चोवीस दलघमी नवीन पाण्याची आवक झालेली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसावरच सर्व काही अवलंबून आहे. पिण्यासाठी मुबलक आणि शेतीला जेमतेम पाणी मिळण्यासाठी मोठ्या पावसाकडे अंबाजोगाईकरांचे डोळे लागले आहेत. आतापर्यंत प्रकल्प क्षेत्र परिसरात ४१० मिमी ४१० मिमी पाऊस झाला आहे. जूनपासून आजपर्यंत ३०.०२३ दलघमी नवीन पाणीसाठा झाला असला तरी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पावसाची गरज आहे.

अशी आहे मांजरा धरणाची स्थिती :

प्रकल्पा क्षमता २२४.०९४ दलघमी असून, सद्य:स्थितीत (१०३.४५४) दलघमी आहे. त्यातील ४७.१३० दलघमी मृतसाठा आहे. पाणी पातळी गाठण्यासाठी मोठा पाऊस हवा आहे. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा १०३.४५४ दलघमी आहे तर धरणाच्या पाणीसाठ्याची एकूण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. मृत पाणीसाठा ४७.१३० दलघमी आहे. सध्या प्रकल्पातील जिवंत साठ्याची टक्केवारी ३१.८३ टक्के आहे.

Web Title: Even after three months, only 31% water is stored in Manjara dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.