संरक्षक कठड्यांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:57+5:302021-07-14T04:38:57+5:30
राडी-मुडेगाव रस्त्यावर खड्डे अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगाव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. शासनाने लाखो ...
राडी-मुडेगाव रस्त्यावर खड्डे
अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगाव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी
बीड : नगरपरिषदेकडून शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा अनियमितपणे करण्यात येत आहे. शहराच्या काही भागात तीन दिवसाआड आणि तेही सात ते आठ तास, तर काही भागात बारा ते पंधरा दिवसाआड आणि तेही फक्त दीड ते दोन तास याप्रमाणे पाणीपुरवठा होतो. शहरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.