रुग्ण वाढताच प्रशासन कठोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:15+5:302021-07-14T04:38:15+5:30
बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. ग्रामीण ...
बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. ग्रामीण भागात पुन्हा रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासन कठोर होत आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
ज्येष्ठांच्या सुविधांकडे दुर्लक्ष
बीड : जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय व सहकारी बँकांमध्ये वृद्ध, महिला, वयोवृद्ध पेन्शनर, तसेच दिव्यांग व्यक्तींना योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयींचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रानडुकरांची धास्ती
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतातील उसासह, खरिपाच्या कोवळ्या पिकांची रानडुकरे मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रस्ता दुरुस्ती करा
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत लक्ष दिले जात नाही.
हातपंप दुरुस्त करा
बीड : तालुक्यातील पालसिंगण परिसरातील हातपंप नादुरुस्त आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना हातपंप दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी सरपंच विक्रम खंडागळे यांनी केली.