बसस्थानक परिसरात दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:26+5:302021-07-14T04:38:26+5:30
वाळलेल्या वृक्षाने धोका वाढला धारुर : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जुने वृक्ष मोठ्या प्रमाणात ...
वाळलेल्या वृक्षाने धोका वाढला
धारुर : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जुने वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. हे वृक्ष वाळलेले असल्याने जोरदार वारा सुटला की धोकादायक बनले आहेत. त्यामुळे मामला तलावाच्या काठावरील वाळलेले जुने वृक्ष काढण्याची गरज आहे.
नाली सफाई कामे रखडली
वडवणी : शहरातील मुख्य रस्त्याच्या व पोलीस ठाण्याच्या मागच्या प्रभागात नाली सफाई कामे रखडली असल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. ठिकठिकाणी नाली बुजली गेल्याने दुर्गंधीचे पाणी रस्त्यावर उतरले असल्याने परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते आहे. तात्काळ नगरपंचायतीने नाल्या साफ करून दुर्गंधी हटविण्याची मागणी व्यावसायिक व्यापारी विद्यार्थी यांनी केली आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे
शिरुर कासार : कोरानाचा धोका संपूर्णतः कमी झाला नसल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्स राखावा, सॅनिटायझरचा वापर अशा नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रत्येकाने स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेच आहे. अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
शेतात, घरासमोर होतात विवाह सोहळे
माजलगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय व मंदिराऐवजी शेतास पसंती दिली जात आहे. बहुतांश विवाह सोहळे शेतात होताना दिसत आहेत. साध्या पद्धतीने शेतात छोटासा मंडप टाकून विवाह होत आहेत. त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे. मोजक्याच नातेवाईक, आप्तेष्टांच्या उपस्थितीत विवाह होत आहेत.
शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान वाटप करा
बीड : कर्ज माफीची घोषणा होऊन दोन वर्ष होत असून,
शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु दोन वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांना या अनुदानाची प्रतीक्षा लागली असून, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याकरिता हे अनुदान तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.