राष्ट्रीयीकृत बँकांनी केले केवळ तीन टक्के पीक कर्ज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 05:00 AM2021-05-30T05:00:00+5:302021-05-30T05:00:13+5:30

आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी आणि जिल्हा बँकांना ४६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत ४१ हजार १११ शेतकऱ्यांना २३० कोटी एक लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वितरण झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७५ टक्के केल्याने हे उद्दिष्ट ४८ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे.

Only three per cent of crop loans disbursed by nationalized banks | राष्ट्रीयीकृत बँकांनी केले केवळ तीन टक्के पीक कर्ज वितरण

राष्ट्रीयीकृत बँकांनी केले केवळ तीन टक्के पीक कर्ज वितरण

Next
ठळक मुद्देजिल्हा बँकेची आघाडी : कोरोना संकटातही गतवर्षीसारखी अवस्था

देवानंद नंदेश्वर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. विविध बँकांमध्ये कर्जासाठी उंबरठे झिजवत आहेत. अशा संकटाच्या काळातही पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँका माघारल्याचे दिसत आहे. उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच कर्जाचे वितरण या बँकांनी केले आहे. याउलट शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्ब्ल ७५ टक्के कर्ज वितरण करून यंदाही आघाडी घेतली आहे. वेळेवर पीक कर्ज मिळाले नाही, तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी आणि जिल्हा बँकांना ४६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत ४१ हजार १११ शेतकऱ्यांना २३० कोटी एक लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वितरण झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७५ टक्के केल्याने हे उद्दिष्ट ४८ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३९ हजार ४६७ शेतकऱ्यांना २०९ कोटींचे वितरण करण्यात आले. विदर्भ, कोकण बँकेला ३६ कोटी ७५ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १०३१ शेतकऱ्यांना ८० कोटी १ लाख म्हणजे २२ टक्के कर्ज वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील खासगी बँकांना १९ कोटी ३८ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्यांनी १२५ शेतकऱ्यांना एक कोटी ८७ लाखांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या १० टक्के कर्ज वितरण झाले आहे.
दरवर्षी राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वितरित करताना नकारघंटा देतात, असा अनुभव आहे. ऐनवेळेपर्यंतही कर्ज दिले जात नाही. यावर्षी राष्ट्रीयीकृत बँकांना १२८ कोटी नऊ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ४८८ शेतकऱ्यांना ३६ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात २२ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. त्यापैकी ११ बँकांना पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 
मात्र, यापैकी केवळ बँका ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेने कर्ज वितरित केले आहे. इतर सात बँकांनी तर अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्याला कर्जाचे वितरण केले नाही.  

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू आहे. पीक कर्ज वाटपाची उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले आहे. 
-अशोक कुंभलवार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, भंडारा.

 

Web Title: Only three per cent of crop loans disbursed by nationalized banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.