४१ हजार हेक्टरमधील रबी पिके धोक्यात

By admin | Published: January 3, 2016 01:06 AM2016-01-03T01:06:43+5:302016-01-03T01:06:43+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत ९१.८२ टक्के रबी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १२०.४१ टक्के लाखलाखोळी तर १३० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली.

Rabi crops in 41 thousand hectares risk | ४१ हजार हेक्टरमधील रबी पिके धोक्यात

४१ हजार हेक्टरमधील रबी पिके धोक्यात

Next

वातावरण बदलाचा फटका रबीची पेरणी ९१ टक्के, यावर्षी तीळ, लाखोळीचा पेरा वाढला
देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्ह्यात आतापर्यंत ९१.८२ टक्के रबी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १२०.४१ टक्के लाखलाखोळी तर १३० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली. १०२ टक्क्यामध्ये हरभरा तर ७६.१७ टक्क्यांमध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे. मात्र वातावरण बदलामुळे ४१ हजार हेक्टरमधील रबी पीके धोक्यात आले असून शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे.
धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे कोठाराला खिंंड पडली. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची आस रबी पिकावर आहे. वातावरण बदलाचा फटका बसत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. यावर्षी कृषी विभागाने ४५,११५ हेक्टर क्षेत्र रबी पिकांसाठी निर्धारित केले आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ९१.८२ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. ४१,४२४ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली.
आजपर्यंत गहू पिकाची ७६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. १० हजार ९९० हेक्टर क्षेत्र या पिकासाठी निर्धारित करण्यात आले. त्यापैकी ८,३७१ हेक्टर क्षेत्रात गहू, हरभरा ८,२३३.७० हेक्टर, लाखोळी ८,२३३, पोपट ८९५, वटाणा १,७३९, उडीद २,५६०, मुंग ३,०८६ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ६४.९४ आहे. जवस २,५१२, करडई ०.४०, मोहरी ७८, तीळ ३९ व इतर गळीत धान्य ४७.५० हेक्टर क्षेत्रामध्ये पीक लागवड करण्यात आली आहे. ज्वारी ४० हेक्टर, भाजीपाला २,२८९.४०, बटाटा १३४, मिरची ८६७ हेक्टर क्षेत्रामध्ये पीक लागवड करण्यात आली आहे. ही आकडेवारी ३० डिसेंबरची आहे.
कृषी विभागाच्या अहवालानुसार, भंडारा तालुक्यात रबी पिकासाठी ८,६३० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले. त्यापैकी ७,०९२ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेली आहे. पवनी तालुक्यात ८,९८० हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी ११,५२८, मोहाडी ५,७४० पैकी ४,३०२, तुमसर ४,६३५ हेक्टर क्षेत्रापैकी ३,७६३ हेक्टर क्षेत्रामध्ये रबीची लागवड करण्यात आली. साकोली तालुक्यात ४,३३० हेक्टर क्षेत्रापैकी २,८४२, लाखांदूर तालुक्यात ८,४५० हेक्टर क्षेत्रापैकी ७,०७० हेक्टरमध्ये, लाखनी तालुक्यात ४,३५० हेक्टर क्षेत्रापैकी ४,८२६ हेक्टर क्षेत्रात रबीची लागवड करण्यात आली. एकाही ठिकाणी सुर्यफुलाची लागवड करण्यात आली नाही. महिनाभरापासून वातावरण बदल असल्याने खरीप हंगामाप्रमाणे रबी हंगामात पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून पीके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभागाने धीर देऊन त्यांना उपाययोजना सुचविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Rabi crops in 41 thousand hectares risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.