वीज तुटीचा फटका शेतकऱ्यांना !

By admin | Published: May 14, 2017 04:04 AM2017-05-14T04:04:00+5:302017-05-14T04:04:00+5:30

सिंचनासाठी शेतकरी रात्री शेतात

Power losses to farmers! | वीज तुटीचा फटका शेतकऱ्यांना !

वीज तुटीचा फटका शेतकऱ्यांना !

Next

बुलडाणा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला असून, याचा फटका मात्र शेतकर्यांना बसत आहे. महावितरणने कृषी पंपांना देण्यात येणार्या विजेत कपात केली असून, दिवसा वीज पुरवठा बंद ठेवून रात्रीच्या सुमारास सुरू करण्यात येत आहे.
दरवर्षी राज्यात उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण होतो. यावर्षीही विविध कारणांमुळे विजेच्या मागणी आणि पुरवठय़ात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणच्यावतीने भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, भारनियमन करीत असताना नागरी वस्तीला जास्तीत जास्त वीज देण्याचे धोरण अवलंबविण्यात आले असून, कृषी पंपांना वीज देण्याला दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. सध्या शेतांमध्ये संत्रा, पपई, मोसंबी, डाळिंब, केळी ही फळपिके आहेत. तसेच उन्हाळी पीकही शेतकरी मोठय़ा प्रमाणात घेत आहेत. वर्हाडात मोठय़ा प्रमाणात संत्र्याचे पीक घेतले जाते. उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाणी देण्याची नितांत गरज असते. या झाडांना पाणी मिळाले नाही, तर वर्षानुवर्षांपासून वाढविलेली झाडे सुकतात व शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. महावितरणच्यावतीने मात्र कृषी पंपांना वीज देण्याला दुय्यम स्थान देण्यात आले असून, भारनियमनात वाढ करण्यात आली आहे. विजेचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कृषी पंपांना कमी प्रमाणात वीज देण्यात येत असून, दिवसभर वीज पुरवठा बंद असतो, तर रात्रीच्या वेळी वीज देण्यात येते. वीज स्थिती बदलताच कृषी पंपांना दिवसा आठ तास व रात्री १0 तास वीज पुरवठा करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरणला महानिर्मितीसह विविध स्रोतांकडून वीज पुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे सुमारे चार हजार मेगावॉटपर्यंत विजेची उपलब्धता कमी असतानाही महावितरणने १५00 मेगावॉटपर्यंत आवश्यकतेनुसार भारनियमन केले आहे.
राज्यातील काही संच तांत्रिक कारणांमुळे बंद असून, सदर संच सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. यासोबतच इतर स्रोतांमधूनही विजेची उपलब्धता वाढविण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले तात्पुरते भारनियमन लवकरच बंद करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Web Title: Power losses to farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.