पोहण्यासाठी गेलेली तीन मुले नदीच्या प्रवाहात वाहून गेली

By राजेश भोजेकर | Published: July 8, 2023 06:46 PM2023-07-08T18:46:19+5:302023-07-08T18:47:06+5:30

Chandrapur News गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील वर्धा नदीत पोहायला गेलेली ३ शाळकरी मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी  दुपारी दोनच्या दरम्यान घडली.

Three children who went swimming in the river were washed away |  पोहण्यासाठी गेलेली तीन मुले नदीच्या प्रवाहात वाहून गेली

 पोहण्यासाठी गेलेली तीन मुले नदीच्या प्रवाहात वाहून गेली

googlenewsNext

राजेश भोजेकर

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील वर्धा नदीत पोहायला गेलेली ३ शाळकरी मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी  दुपारी दोनच्या दरम्यान घडली.


तोहोगाववरून दोन किलोमीटर शिंदीजवळ असणाऱ्या वर्धा नदीत १० ते ११ वयोगटातील ४ मित्र पोहायला गेले होते. त्यापैकी ३ जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. नदी पात्रावर त्यांचे कपडे व पादत्राणे असल्याने हा अंदाज बांधल्या जात आहे. वाहून गेल्यामध्ये प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी व सोनल सुरेश रायपुरे ही मुले असल्याची चर्चा असून आरुष प्रकाश चांदेकर हा मुलगा मात्र पाण्यात न उतरल्याने घरी सुखरूप परत आल्याचे बोलल्या जात आहे. गावातीलच एका महिलेने ३ मुलांना पाण्यात वाहून जाताना बघितल्याने युद्धस्तरावर शोध मोहीम सुरू असून घटनास्थळी लाठी व कोठारी पोलीस दाखल झाले आहे. अद्याप मुलांचा शोध लागला नाही.

Web Title: Three children who went swimming in the river were washed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.