Corona Virus : औरंगाबादमध्ये सहा लाख नागरिक झाले ‘लसवंत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 01:59 PM2021-08-06T13:59:48+5:302021-08-06T14:01:36+5:30

Corona Virus in Aurangabad : दुसरा डोस घेण्यासाठी ४५ हजार नागरिकांना लसींची प्रतीक्षा कायम आहे.

Corona Virus: Six lakh citizens become 'Laswant' in Aurangabad | Corona Virus : औरंगाबादमध्ये सहा लाख नागरिक झाले ‘लसवंत’

Corona Virus : औरंगाबादमध्ये सहा लाख नागरिक झाले ‘लसवंत’

googlenewsNext
ठळक मुद्देदुसऱ्या डोससाठी अनेकांची प्रतीक्षा ५ लाख ७७ हजार जणांचे लसीकरण बाकी

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लस घेऊन शहरात ६ लाख नागरिक ‘लसवंत’ झाले आहेत. मात्र दुसरा डोस घेण्यासाठी ४५ हजार नागरिकांना लसींची प्रतीक्षा कायम आहे. आणखी ५ लाख ७७ हजार नागरिकांचे लसीकरण होणे बाकी असल्याचे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

१८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला प्रतिसाद मिळत असल्याने लाखांचा टप्पा पूर्ण होत आहे. ४ ऑगस्टपर्यंत ५ लाख ९९ हजार २०४ नागरिकांचे लसीकरण मनपाने पूर्ण केले आहे. त्यात ४ लाख २४ हजार १४४ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून १ लाख ७५ हजार ६०० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सहा लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी ८०० नागरिकांच्या लसीकरणाची गरज होती. गुरुवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लसीकरणामुळे १,९१२ नागरिकांचे लसीकरण झाल्याने महापालिका हद्दीतील ६ लाख १ हजार ११६ नागरिक लसवंत झाले आहेत. शहरासाठी लसीकरणाचे ११ लाख ७६ हजार ९९९ उद्दिष्ट आहे. त्यापैकी ५ लाख ७७ हजार नागरिकांचे लसीकरण बाकी आहे.

आज लसीकरण बंद: तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन मिळणार
मनपाला मिळालेले साडेसात हजार लस डोस संपले आहेत. लस पुरवठा होणार नसल्याने शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद राहणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. फक्त कोव्हॅक्सिन लस तीन केंद्रांवर उपलब्ध असेल. क्रांती चौक, राजनगर आणि सिडको एन-४ मधील एमआयटी हॉस्पिटल येथे सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे.

Web Title: Corona Virus: Six lakh citizens become 'Laswant' in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.