मुंबईतील पावसाने विमानांना विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:13 AM2017-08-30T01:13:03+5:302017-08-30T01:13:03+5:30

मुंबईतील पावसाने मंगळवारी (दि. २९) एअर इंडिया आणि जेट एअरवेजच्या मुंबई-औरंगाबाद विमानांना दोन तासांवर विलंब झाला

Delay in flights to Mumbai due to rain | मुंबईतील पावसाने विमानांना विलंब

मुंबईतील पावसाने विमानांना विलंब

googlenewsNext

औरंगाबाद : मुंबईतील पावसाने मंगळवारी (दि. २९) एअर इंडिया आणि जेट एअरवेजच्या मुंबई-औरंगाबाद विमानांना दोन तासांवर विलंब झाला. विमानांना उशीर झाल्याच्या वृत्तास विमान कंपनीच्या अधिकाºयांनी दुजोरा दिला. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान सायंकाळी ५.०५ वाजेच्या सुमारास येते. त्यानंतर हे विमान ५.४० वाजता दिल्लीसाठी उड्डाण घेते; परंतु मुंबईहून येणाºया या विमानास मंगळवारी दोन तासांवर उशीर झाला. त्यामुळे दिल्लीला जाणाºया प्रवाशांना ताटकळावे लागले. जेट एअरवेजच्या मुंबई-औरंगाबाद विमानासही दीड तासांवर विलंब झाला. मुंबईतील पावसामुळे हा विलंब झाला.

Web Title: Delay in flights to Mumbai due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.