जमिनीच्या वादातून भावांची भांडणे

By Admin | Published: May 20, 2014 12:01 AM2014-05-20T00:01:57+5:302014-05-20T00:06:57+5:30

मानवत : तालुक्यातील राजुरा येथे शेतीच्या वादावरून भावाभावांत हाणामारी झाली़ ही घटना १६ मे रोजी रात्री ८ वाजता घडली़

Fights of brothers from the dispute of land | जमिनीच्या वादातून भावांची भांडणे

जमिनीच्या वादातून भावांची भांडणे

googlenewsNext

मानवत : तालुक्यातील राजुरा येथे शेतीच्या वादावरून भावाभावांत हाणामारी झाली़ ही घटना १६ मे रोजी रात्री ८ वाजता घडली़ तालुक्यातील राजूर येथे भाऊसाहेब लक्ष्मण राऊत यांना संपत्ती, पांडुरंग, रामेश्वर हे तीन भाऊ आहेत़ आईच्या नावे नऊ एकर जमीन होती़ त्यापैकी अर्धी जमीन चारही भावंडांच्या नावे करून भाऊसाहेबांची आई त्यांच्याकडेच राहत आहे आणि आईकडे अर्धी जमीन आहे़ याचा उर्वरित भावांना राग येऊन त्यांनी भाऊसाहेब राऊत यांना तू आमची जमीन एकटाच हडपणार काय? तू आईला स्वत:जवळ का ठेवलेस असे म्हणून भाऊसाहेब राऊत व त्यांची पत्नी मीराबाई हिस धमक्या देऊन नालीत ढकलून देऊन मारहाण केली़ भाऊसाहेब राऊत यांच्या तक्रारीवरून मानवत पोलिस ठाण्यात संपत्ती राऊत, पांडुरंग राऊत, रामेश्वर राऊत, सचिन राऊत, पुष्पा राऊत, राधाबाई राऊत व सरस्वतीबाई राऊत यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास बीट जमादार नामदेव राठोड हे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Fights of brothers from the dispute of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.