कºहाळे कुटुंबियांवर दोन्ही मुले गेल्याने शोककळा
By Admin | Published: May 19, 2014 11:51 PM2014-05-19T23:51:48+5:302014-05-20T00:05:58+5:30
हिंगोली : दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने चोरजवळा येथील कºहाळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.
हिंगोली : दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने चोरजवळा येथील कºहाळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी सोमवारी दुपारी हिंगोली तालुक्यातील चोरजवळा येथे या मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे कºहाळे कुटंबासारखेच जयराम दरोगे यांनाही दोनच मुले होती. हिंगोली तालुक्यातील चोरजवळा येथील कुंडलीक कºहाळे यांना मारोती (१४) आणि सोपान (१२) दोनच मुले होती. काही वर्षापूर्वी कामासाठी नाशिक येथे राहत असलेले कºहाळे कुटंूब नातेवाईकाच्या लग्नासाठी वाशिम जिल्ह्यातील सोडा येथे आले होते. तसेच वाशिम तालुक्यातील झोडगा येथील त्यांचे मावसभाऊ गणेश जयराव दरोगे (१६) व अनिकेत जयराम दरोगे (११) दोघे लग्नासाठीच आले होते. चौघेजण रविवारी सकाळी घराबाहेर पडले होते. दरम्यान शेतातील भूईमुगाच्या शेंगा खाल्यानंतर शेजारीच असलेल्या वाई सावळी येथील धरणात पोहण्यासाठी चौघे उतरले. एकालाही धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बडून अंत झाला. सांयकाळपर्यंत घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध केला असता या चौघांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. जयराम दरोगे आणि कुंडलीक कºहाळे यांच्या दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने नातेवाईंवर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी मृतदेह पाण्याबाहेर काढल्यांतर वाशिम येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी दुपारी या मुलांवर चोरजवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)