पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी

By सुमित डोळे | Published: August 3, 2024 02:30 PM2024-08-03T14:30:15+5:302024-08-03T14:35:01+5:30

संवेदनशील विभागाचा कारभार अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर; ४ वाजताच बंद, नेहमी वर्दळ राहणाऱ्या कार्यालयात आता स्मशान शांतता

The 'Bharosa Cell' of the police, which resolves disputes between husband and wife, is left alone | पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी

पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी

छत्रपती संभाजीनगर : पती-पत्नीचे वाद सोडवून त्यांना पुन्हा गुण्यागोविंदाने एकत्र आणण्याची जबाबदारी असलेला ‘भरोसा सेल’चा आता एकाकी पडला आहे. एकेकाळी सर्वाधिक वर्दळ राहणाऱ्या या कार्यालयात आता स्मशान शांतता पाहायला मिळत आहे. अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर चालणारा या भरोसा सेलचा आता ‘भरोसा’च उरला नसण्याची वेळ तक्रारदारांवर आली आहे.

कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारखी प्रकरणे सोडवण्यासाठी २०१७ मध्ये पहिल्यांदा राज्य सरकारने भरोसा सेल संकल्पनेची घोषणा केली होती. त्यानंतर प्रत्येक शहर व जिल्हास्तरावर पोलिस आयुक्त व अधीक्षक कार्यालयात हा सेल सुरू करण्यात आला. त्याला पोलिस निरीक्षक पदाचा अधिकारी प्रभारी म्हणून नेणे बंधनकारक असून स्वतंत्र दालन, कर्मचारी व समुपदेशकांची नियुक्ती करण्याचे आदेश आहेत. किरकोळ कारणातूनही पती-पत्नीमध्ये घटस्फोट, विभक्त होण्यासह एकमेकांना गंभीर मारहाण करण्यापर्यंत वाद पोहोचतात. समुपदेशनानंतरही समाधान न झाल्यास अखेर प्रकरण न्यायालय किंवा पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्यात येते. वकील, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिस अधिकारी यात समुपदेशन करुन दाम्पत्यांमध्ये समेट घडवण्यासाठी प्रयत्न करतात.

कौटुंबिक कलहांत वाढ
चार वर्षांमध्ये कौटुंबिक कलहांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २०२१मध्ये कौटुंबिक वादाच्या २,०६७ तक्रारींपैकी केवळ ४४१ प्रकरणांत समझोत्यासाठी पोलिसांना यश आले, तर २०२४च्या चार महिन्यांमध्येच शहरात ५४६ पती-पत्नीचे वाद पोलिसांपर्यंत पोहोचले.

वर्षे - तक्रारी -समझोता
२०२१ -२०६७ -४४१
२०२२ - २२२६ -५१०
२०२३ -१८७३ -३८३
२०२४ -५४६ २०९

वर्षे -कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे
२०२० -२०६
२०२१ -२८८
२०२२ -२७३
२०२३ -२४९

दुपारी ३ला विभाग बंद
-सिल्लेखाना परिसरात शहर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’साठी मनपाच्या इमारतीत स्वतंत्र मजला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत स्वतंत्र निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ८ कर्मचारी व समुपदेशक येथे कार्यरत होते.
-गेल्या काही दिवसांपासून मात्र केवळ २ ते ३ कर्मचारीच कार्यरत आहेत.
-सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणारा विभाग आता दुपारी ३ वाजताच बंद होतो, हे विशेष.

पोलिस भरती, सेवानिवृत्ती तर बदली
-गुरुवारी दुपारी २:३० वाजता विभागाची पाहणी केली असता दोन समुपदेशक महिला तर एक पोलिस कर्मचारी विभागात होते. बाहेर तक्रारदार प्रतीक्षेत बसले होते. दिवसाला किमान २० तक्रारदार असतात. त्यांची तक्रार ऐकून घेण्यासाठी देखील तेथे कोणी उपस्थित नसते.
-यातील एक कर्मचारी नुकतेच सेवानिवृत्त झाले. एका कर्मचाऱ्याची बदली झाली तर उर्वरित सर्व कर्मचारी पोलिस भरतीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदारांना मात्र पोलिस विभागाच्या या अती ‘व्यस्ततेचा’ मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Web Title: The 'Bharosa Cell' of the police, which resolves disputes between husband and wife, is left alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.