हे एका रात्री मिळवलेलं यश नाही! ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे भावनिक स्पीच 

रोहित शर्माने ( Rohit Sharma) अखेर टीम इंडियाचा ११ वर्षांचा आयसीसी स्पर्धेतील जेतेपदाचा दुष्काळ संपवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 12:26 AM2024-06-30T00:26:20+5:302024-06-30T00:26:54+5:30

whatsapp join usJoin us
INDIA WON THE T20I WORLD CUP 2024 - It is not today, it is what we have been doing for the last 3-4 years, Say Rohit Sharma | हे एका रात्री मिळवलेलं यश नाही! ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे भावनिक स्पीच 

हे एका रात्री मिळवलेलं यश नाही! ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे भावनिक स्पीच 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA Live Scorecard : रोहित शर्माने ( Rohit Sharma) अखेर टीम इंडियाचा ११ वर्षांचा आयसीसी स्पर्धेतील जेतेपदाचा दुष्काळ संपवला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये बाजी मारली. २००७ नंतर भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून विजय मिळवताना रडताना दिसला. एकवेळ अशी आलेली की भारताने ही मॅच गमावली होती, परंतु हार्दिक पांड्याने निर्णायक विकेट घेतली आणि जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव यांनी सामन्याला पूर्ण कलाटणी दिली. 


 विराट कोहली व अक्षर पटेल यांच्या दमदार खेळीने भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. अक्षरने ३१ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावा केल्या. शिवम दुबेने २७ धावा चोपल्या. विराटने ५९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७६ धावा केल्या. भारताने ७ बाद १७६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, आफ्रिकेकडून त्रिस्तान स्तब्स ( ३१), क्विंटन डी कॉक ( ३९) व हेनरिच क्लासेन ( ५२) यांनी दमदार खेळ केला. २४ चेंडूंत २६ धावा हव्या असताना हार्दिकने क्लासेनची विकेट घेतली. बुमराहने टाकलेले १८वे षटक निर्णायक ठरले. २०व्या षटकात डेव्हिड मिलरचा सीमारेषेवर सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेऊन भारताचा विजय पक्का केला. आफ्रिकेला १६९ धावाच करता आल्या.


रोहित शर्मा काय म्हणाला... 
रोहित शर्मा, "गेल्या तीन-चार वर्षांत आम्ही काय अनुभवले आहे, हे सांगणे कठीण आहे. पडद्यामागील बरेच काही आहे, आम्ही आज जे केले ते बऱ्याच वर्षांची मेहनत आहे. अनेक दडपणाचे सामने आम्ही खेळले आणि त्यावेळी आम्ही चुकीच्या बाजूला राहिलो. दडपण असताना काय करावे, हे या खेळाडूंना चांगल्या पद्धतीने माहित्येय. आज त्याचे एक परिपूर्ण उदाहरण आहे. आम्ही आतुरतेनं या विजयाची वाट पाहत होते. या खेळाडूंचा आणि व्यवस्थापनाचा खूप अभिमान आहे. त्यांनी आम्हाला खेळण्याचे स्वातंत्र्य आणि तो विश्वास दिला."


''विराटच्या फॉर्मवर कोणालाही शंका नव्हती. त्याच्याकडे असलेली गुणवत्ता आम्हाला माहीत आहे. या सामन्यात कोणीतरी शक्य तितक्या लांब फलंदाजी करायची होती, ती विराटने केली. विराटचा अनुभव कामी आला. मी जसप्रीत बुमराहला इतकी वर्षे खेळताना पाहिले आहे, पण तो हे कसे करतो हे देखील मला माहित नाही. तो एक मास्टरक्लास आहे. तो त्याच्या कौशल्यांचा पाठीराखा करतो आणि तो खूप आत्मविश्वास असलेला मुलगा आहे. हार्दिकने शेवटच्या षटकात गोलंदाजीही केली. चाहत्यांसाठी न्यूयॉर्कमधून बार्बाडोसपर्यंत आम्हाला पाठिंबा देणे विलक्षण आहे. भारतीयांचे आभार,''असेही रोहित म्हणाला. 

 

Web Title: INDIA WON THE T20I WORLD CUP 2024 - It is not today, it is what we have been doing for the last 3-4 years, Say Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.