Asia Cup Ind Vs Pak:किंग कोहलीने जिंकली मनं! पाकिस्तानी खेळाडूला आपली जर्सी देऊन दाखवली खेळभावना

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामन्यात भारताचा विजय झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:44 PM2022-08-29T18:44:02+5:302022-08-29T18:45:43+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup Ind Vs Pak Virat Kohli gifts his signed jersey to Haris Rauf after match  | Asia Cup Ind Vs Pak:किंग कोहलीने जिंकली मनं! पाकिस्तानी खेळाडूला आपली जर्सी देऊन दाखवली खेळभावना

Asia Cup Ind Vs Pak:किंग कोहलीने जिंकली मनं! पाकिस्तानी खेळाडूला आपली जर्सी देऊन दाखवली खेळभावना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Pakistan । नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने होते. चुरशीच्या या लढतीत अखेर भारतीय संघाने विजय मिळवून टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाबाद 35 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी हा सामना अविस्मरणीय होता. कारण किंग कोहली एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे, ज्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सामन्यांचे शतक ठोकले आहे.

कोहलीने जिंकली मनं 

दरम्यान, हा विक्रमी आकडा गाठणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या रॉस टेलरने 112 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून ही किमया साधली आहे. तर आतापर्यंत विराट कोहलीने 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 100 टी-20 सामने खेळले आहेत. विराटने या महत्त्वाच्या सामन्यात 35 धावांची साजेशी खेळी करून भारताच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. मात्र कोहलीने पाकिस्तानचा खेळाडू हरिस रौफला (Haris Rauf) आपली जर्सी देऊन खेळभावना दाखवून दिली आहे, कोहलीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून चाहते कोहलीचे कौतुक करत आहेत. विराटने सही करून हरिस रौफला त्याची जर्सी भेट म्हणून दिली आहे. 

सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकांमध्ये सर्वबाद 147 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. संघाचा सलामीवीर फलंदाज के.एल राहुल आपल्या पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. त्याला टी-२० मध्ये पदार्पण केलेल्या नसीम शाहने बाद केले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. किंग कोहलीने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करून ३५ धावांची साजेशी खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने प्रभावशाली २९ चेंडूंत ३५ धावांची खेळी केली, तर विराट कोहली (३५), रोहित शर्मा (१२), सूर्यकुमार यादव (१८) आणि हार्दिक पांड्याने नाबाद ३३ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. 

 

Web Title: Asia Cup Ind Vs Pak Virat Kohli gifts his signed jersey to Haris Rauf after match 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.