Join us  

मला कर्णधार बनवतो म्हणून सांगितले अन् दोन महिन्यांत संघाबाहेर काढले; वीरेंद्र सेहवागचा खळबळजनक दावा

वीरेंद्र सेहवागने फलंदाजीचे बरेच विक्रम मोडले असले तरी, भारतीय संघाचा कर्णधार न होणे ही त्याची सर्वात मोठी हुकलेली संधी ठरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 7:19 PM

Open in App

वीरेंद्र सेहवागने फलंदाजीचे बरेच विक्रम मोडले असले तरी, भारतीय संघाचा कर्णधार न होणे ही त्याची सर्वात मोठी हुकलेली संधी ठरेल. २००३ आणि २०१२  या कालावधीत सेहवागने १२ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, ज्यात २००६साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक पहिल्या-वहिल्या ट्वेंटी-२० सामन्याचा समावेश होता. सेहवागचा भारतीय संघाचा कर्णधार होण्याची सर्वोत्तम वेळ २००५ मध्ये ग्रेग चॅपेल प्रशिक्षक बनले तेव्हाची होती, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सौरव गांगुलीला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडले गेले आणि तो संघातून बाहेर पडल्यानंतर ही जबाबदारी राहुल द्रविडकडे सोपवण्यात आली.   

२००७ मध्ये जेव्हा द्रविड पायउतार झाला तेव्हा महेंद्रसिंग धोनी कर्णधार झाला आणि सेहवाग उपकर्णधार झाला. परदेशी विरुद्ध देशांतर्गत प्रशिक्षक वादावर लक्ष केंद्रीत करताना, सेहवागने भारताचे कर्णधारपद मिळविण्याच्या जवळ कसे आलो हे स्पष्ट करताना म्हटले की, "जेव्हा ग्रेग चॅपल आले, तेव्हा चॅपलने पहिले विधान केले होते की सेहवाग पुढचा कर्णधार असेल. मला माहित नाही की २ महिन्यांत मला संघातून वगळण्यात आले.

"माझा नेहमीच असा विश्वास आहे की, आपल्या देशात भारतीय संघाचे व्यवस्थापन करू शकणारे चांगले प्रशिक्षक आहेत; त्यामुळे आम्हाला परदेशी प्रशिक्षकांची गरज नाही. पण जेव्हा मी खेळत होतो, तेव्हा मी माझ्या वरिष्ठांना हा प्रश्न विचारला होता, 'आम्हाला दुसऱ्या परदेशी प्रशिक्षकाची गरज का आहे?  भारतीय प्रशिक्षकांसोबत बराच वेळ घालवलेल्या या सर्वांनी सांगितले की भारतीय प्रशिक्षक कधीकधी खेळाडूंबद्दल पक्षपाती असतात. त्यामुळे जेव्हा एखादा परदेशी प्रशिक्षक येतो तेव्हा तो त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. एखाद्या विदेशी प्रशिक्षकालाही तेंडुलकर किंवा द्रविड किंवा गांगुली किंवा लक्ष्मण यांच्याशी वागण्याचा दबाव जाणवू शकतो,"असे सेहवाग म्हणाला.  

सेहवाग भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत पाहिलेल्या दोन सर्वात यशस्वी परदेशी प्रशिक्षक जॉन राइट आणि गॅरी कर्स्टन यांच्या हाताखाली खेळला. २००० ते २००५  या कालावधीत राईट प्रशिक्षक असताना सेहवागला कसोटी आणि वन डे या दोन्ही फॉरमॅटमध्ये सलामीला पदोन्नती दिली आणि त्याने पाकिस्तानविरुद्ध मुलतान येथे प्रसिद्ध २०९ धावा केल्या.  "मला वाटते की भारतीय संघाला प्रशिक्षणाची गरज नाही; त्यांना एक व्यवस्थापक हवा आहे जो सर्व खेळाडूंशी मैत्री करू शकेल. प्रशिक्षकाला माहित असले पाहिजे की कोणत्या खेळाडूला किती सरावाची गरज आहे आणि गॅरी कर्स्टन हे त्या बाबतीत सर्वोत्तम होते. मी फक्त ५० चेंडू खेळतो, द्रविड २००, सचिन २०० आणि असे बरेच काही,''असे तो म्हणाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :विरेंद्र सेहवागभारतीय क्रिकेट संघ
Open in App