Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:स्ट्रेचरवरून मला याच स्टेडियमवर बाहेर नेलं होतं; मैदानावर पाऊल ठेवताच हार्दिक पांड्याला आठवली 'ती' घटना

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 01:01 PM2022-08-29T13:01:29+5:302022-08-29T13:02:30+5:30

whatsapp join usJoin us
hardik pandya emotional Asia Cup journey to share with ravindra jadeja, watch the video  | Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:स्ट्रेचरवरून मला याच स्टेडियमवर बाहेर नेलं होतं; मैदानावर पाऊल ठेवताच हार्दिक पांड्याला आठवली 'ती' घटना

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:स्ट्रेचरवरून मला याच स्टेडियमवर बाहेर नेलं होतं; मैदानावर पाऊल ठेवताच हार्दिक पांड्याला आठवली 'ती' घटना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Pakistan । नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. भारतीय संघाने या बहुचर्चित स्पर्धेत आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (Indian Won The Match Against Pakistan) धूळ चारून विजयी सलामी दिली आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 5 बळी आणि 2 चेंडू राखून विजय मिळवला. चुरशीच्या या लढतीत अखेर भारतीय संघाने विजय मिळवून टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. पाकिस्तानने मागील वर्षी टी-20 विश्वचषकात भारताला 10 बळी राखून पराभूत केले होते, त्यामुळे रविवारच्या सामन्यात भारताने मागील पराभवाचा वचवा काढला आहे. 

दरम्यान. हार्दिक पांड्या भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला. हार्दिकने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात 35 धावांची उल्लेखणीय खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. मागील आशिया चषकाच्या सत्रात याच स्टेडियमवरून दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला बाहेर जावे लागले होते. सामना पार पडल्यानंतर हार्दिकने याच आठवणींना उजाळा दिला आहे, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. यामध्ये सामन्याचे दोन हिरो रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या एकमेकांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत. 

हार्दिकने जुन्या आठवणींना दिला उजाळा
"फिरकीपटूंविरूद्ध आक्रमक रूप धारण करायचे हेच माझ्या मनात होते. आपल्या दोघांची भागीदारी झाली, जी भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाची होती", असे रविंद्र जडेजा म्हणत आहे. तर "मला सगळे काही आठवत आहे, मी इथूनच स्ट्रेचरवर बाहेर गेलो होतो आणि हेच ड्रेसिंग रूम होते. पण आता मला समाधान आहे की जे काही झाले त्यानंतर आता संधी मिळाल्यावर ज्या पद्धतीने मी खेळी केली आहे त्याचा हा प्रवास खूप सुंदर आहे", अशा शब्दांत पांड्याने आपला इथपर्यंतचा प्रवास मांडला. 

तर शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची आवश्यकता असताना तुझ्या मनात काय होते असे जडेजाने विचारले असता हार्दिकने म्हटले, "एका षटकात 7 धावा  माझ्यासाठी जास्त नव्हत्या कारण समोर फिरकीपटू गोलंदाज होता. तसेच बाहेर फक्त 5 फिल्डर होते, ज्याचा मला फायदा घेता आला." लक्षणीय बाब म्हणजे हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

भारताची विजयी सलामी
भारताच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. संघाचा सलामीवीर फलंदाज के.एल राहुल आपल्या पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. त्याला टी-२० मध्ये पदार्पण केलेल्या नसीम शाहने बाद केले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. किंग कोहलीने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करून ३५ धावांची साजेशी खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने प्रभावशाली २९ चेंडूंत ३५ धावांची खेळी केली, तर विराट कोहली (३५), रोहित शर्मा (१२), सूर्यकुमार यादव (१८) आणि हार्दिक पांड्याने नाबाद ३३ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. 

 

Web Title: hardik pandya emotional Asia Cup journey to share with ravindra jadeja, watch the video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.