Join us  

IND vs ENG Live: आणखी एक 'यशस्वी' द्विशतक! इंग्लंडला ५५७ धावांचे तगडे आव्हान

IND vs ENG 3rd Test Live: गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 1:12 PM

Open in App

IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi | राजकोट: तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी देखील भारतीय शिलेदारांचा झंझावात सुरूच आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वालने तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले अन् चौथ्या दिवशी द्विशतकाला गवसणी घातली. रिटायर्ड हर्टमुळे तिसऱ्या दिवसातील अखेरच्या षटकांना जैस्वाल मुकला होता. तिसऱ्या दिवसअखेर यजमान भारताने ३२२ धावांची मजबूत आघाडी घेतली होती, ज्यात यशस्वी द्विशतकाने आणखी भर घातली. सर्फराज खान आणि शुबमन गिल यांच्या अर्धशतकी खेळीची यशस्वीला चांगली साथ मिळाली. त्याने २३१ चेंडूत १० षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने २०० धावांचा आकडा गाठला. यशस्वी जैस्वाल २१४ आणि सर्फराज खान ६८ धावा करून नाबाद परतला. भारताने ४३० धावांवर डाव घोषित केला असून इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांची आवश्यकता आहे.

दरम्यान, तिसऱ्या दिवसअखेर ५१ षटकांत २ बाद १९६ धावा करून ३२२ धावांची मजबूत आघाडी घेतली होती. शुबमन गिल (६५) आणि कुलदीप यादव (३) नाबाद परतले होते. पण, चौथ्या दिवशी गिल आपले शतक पूर्ण करेल असे अपेक्षित असताना त्याला धावबाद व्हावे लागले. आज चौथ्या दिवशी खेळपट्टीवर येण्यापूर्वी जैस्वालने ५ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १३३ चेंडूत १०४ धावा केल्या होत्या. भारताने दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली. रोहित शर्मा (१९) स्वस्तात बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी मोर्चा सांभाळला. गिल १५१ चेंडूत ९१ धावा करून धावबाद झाला. पण यशस्वीने आपला अप्रतिम खेळ सुरूच ठेवला अन् वैयक्तिक द्विशतकासह भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. 

भारताचा पहिला डावनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात निराशाजनक झाली. पण, कर्णधार रोहित शर्माने डाव सावरला अन् दबावाच्या स्थितीत शतकी खेळी केली. त्याला रवींद्र जडेजाने चांगली साथ दिली. रोहितने १३१ चेंडूत १९६ धावांची अप्रतिम खेळी केली. याशिवाय रवींद्र जडेजाने २२५ चेंडूत ११२ धावा कुटल्या. पदार्पणवीर सर्फराज खानने स्फोटक खेळी करत पहिल्या सामन्यातील पहिला डाव अविस्मरणीय केला. त्याने ६६ चेंडूत ६२ धावा केल्या पण जड्डूच्या चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद झाला. अखेर भारताने आपल्या पहिल्या डावात १३०.५ षटकांत सर्वबाद ४४५ धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात मार्क वुडने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर रेहान अहमद २ आणि जेम्स अँडसरन, टॉम हार्टली, आणि जो रूट यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

इंग्लंडचा पहिला डावभारताने ४४५ धावांचा डोंगर उभारल्यानंतर पाहुणा इंग्लिश संघाव दबावात आला. पण, बेन डकेटने यजमानांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याने १५१ चेंडूत १५३ धावांची मोठी खेळी केली. याशिवाय ओली पोप (३९) आणि कर्णधार बेन स्टोक्सने (४१) धावा केल्या. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लिश संघ मजबूत स्थितीत होता. पण तिसऱ्या दिवशी यजमानांनी पुनरागमन केले. अखेर इंग्लंड आपल्या पहिल्या डावात ७१.१ षटकांत ३१९ धावांत सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर कुलदीप यादव (२) आणि रवींद्र जडेजा (२) तसेच जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडयशस्वी जैस्वालसर्फराज खानभारतीय क्रिकेट संघशुभमन गिल