Join us  

४७ धावा करून भारत जिंकला; १३९ धावा करणाऱ्या आयर्लंडचा पराभव झाला

IND vs IRE 1st T20I - भारतीय संघाने जसप्रीत बुमराहाच्या नेतृत्वाखाली पहिली ट्वेंटी-२० मॅच जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 10:49 PM

Open in App

IND vs IRE 1st T20I - भारतीय संघाने जसप्रीत बुमराहाच्या नेतृत्वाखाली पहिली ट्वेंटी-२० मॅच जिंकली. बुमराहसह रवी बिश्नोई व प्रसिद्ध कृष्णा यांनी चांगली गोलंदाजी केली. बॅरी मॅकार्थीच्या फटकेबाजीने आयर्लंडला १३९ धावांपर्यंत पोहोचवले, भारताकडून ऋतुराज गायकवाड व यशस्वी जैस्वाल यांनी चांगली सुरुवात केली. पण, २ चेंडूंत २ विकेट्स पडल्याने मॅचला कलाटणी मिळाली. तरीही ४७ धावा करून भारताने बाजी मारली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. 

भारताच्या गोलंदाजांनी आयर्लंडचा  निम्मा संघ ३१ धावांवर तंबूत पाठवला. पण, कर्टीस कॅम्फर ( ३९) व बॅरी मॅकार्थी यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाला पुनरागमन करून दिले. जसप्रीतने ( २-२४) पहिल्या षटकात दोन धक्के दिल्यानंतर रवी बिश्नोई ( २-२३) व प्रसिद्ध कृष्णा ( २-३२) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. आयर्लंडची अवस्था ५ बाद ३१ अशी केली. कॅम्फर आणि मॅकार्थी यांनी ४४ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली.  मॅकार्थीने ३३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ५१ धावा केल्या. त्याने संघाला ७ बाद १३९ धावांपर्यंत पोहोचवले. अर्शदीपच्या २०व्या षटकात मॅकार्थीने २२ धावा कुटल्या. 

ऋतुराज गायकवाड व यशस्वी जैस्वाल यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. सुरुवातीला ऋतुराज रन आऊट होता होता वाचला. पण, त्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी सावध खेळ केला. पावसाच्या शक्यतेमुळे भारताला ५ षटकांत २७ धावा करायच्या होत्या आणि ऋतुराजने षटकार खेचून भारताला तो पल्ला गाठून दिला. या दोघांची ४६ धावांची भागीदारी क्रेग यंगने तोडली. यशस्वी ( २४) झेलबाद झाला अन् त्यानंतर तिलक वर्माही गोल्डन डकवर माघारी परतला. भारताने ६.५ षटकांत २ बाद ४७ धावा केल्या आणि पावसामुळे सामना थांबवण्यात आला. भारतीय संघ DLS नुसार २ धावांनी आघाडीवर होता आणि अखेरीस पाऊस कायम राहिल्याने भारताला विजयी घोषित केले गेले. ( यशस्वी व तिलक यांच्या विकेट्स

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघआयर्लंड
Open in App