Join us  

IND vs SL 2nd T20I Live : इशान २, गिल ५, राहुल ५, हार्दिक १२! श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ माघारी पाठवला

India vs Sri Lanka 2nd T20I Live :  आशियाई चॅम्पियन श्रीलंकेने आज दमदार खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 9:40 PM

Open in App

India vs Sri Lanka 2nd T20I Live :  आशियाई चॅम्पियन श्रीलंकेने आज दमदार खेळ केला. नाणेफेकीचा कौल बाजून लागूनही हार्दिक पांड्याने गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय अनेकांना आश्चर्याचा वाटला. संघाला आव्हानात्मक परिस्थितीसाठी तयार करण्याचा हार्दिकचा आजचा डाव उलटला. 

उम्रानची हॅटट्रिक हुकली, अर्शदीपने No Ballची रांग लावली; श्रीलंकेच्या धावा पाहून हार्दिकला लाज वाटल

कुसल मेंडिस व पथुम निसंका यांनी श्रीलंकेला आक्रमक सुरुवात करून  दिली. पण, युझवेंद्र चहलने पहिले यश मिळवून दिले. उम्रान मलिकने ( Umran Malik) तीन विकेट्स घेतल्या, परंतु त्याने धावाही दिल्या. पुनरागमन करणाऱ्या अर्शदीप सिंगने आज ५ नो बॉल टाकले आणि त्याच्या या नो बॉलवर श्रीलंकेने आत्मविश्वास कमावला.  कुसल मेंडिस ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांवर LBW झाला. मधल्या फळीत भानुका राजपक्षा ( २) व धनंजया सिल्वा (  ३) हे अपयशी ठरले. निसंका पथुम ३३ धावांवर माघारी परतला. उम्रानने १६व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूवर दोन विकेट्स घेत श्रीलंकेला मोठे धक्के दिले. चरिथ असलंका ( ३७) व वनिंदू हसरंगा ( ०) हे बाद झाले.  

अक्षरने २४ धावांत २, चहलने ३० धावांत १ विकेट घेतली. १८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उम्रान हॅटट्रिकवर होता, परंतु दासून शनाकाने खणखणीत चौकार खेचला. त्या षटकात श्रीलंकेने २१ धावा चोपल्या. उम्रानने ४३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शनाका ३० धावांवर झेलबाद झाला, परंतु अर्शदीपचा तो चेंडू No Ball ठरला. हार्दिकने रागात तोंड झाकून घेतले. शनाकाने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. शनाका २२ चेंडूंत २ चौकार व ६ षटकार खेचत ५६ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेने ६ बाद २०६ धावा केल्या. अर्शदीपने २ षटकांत ३७ धावा दिल्या. पहिल्या सामन्यातील नायक शिवम मावीने ४ षटकांत ५३ धावा दिल्या. 

प्रत्युत्तरात इशान किशन ( २) दुसऱ्याच षटकात कसून रजिथाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पहिल्या चेंडूवर किशनची विकेट अन् अखेरच्या चेंडूवर शुबमन गिल ( ५) याला माघारी पाठवून रजिथने भारतावरील दडपण वाढवले. दिलशान मदुशंकाने तिसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर पदार्पवीर राहुल त्रिपाठीची ( ५) विकेट घेतली अन् पुण्याच्या स्टेडियमवर सन्नाटा झाला. हार्दिक पांड्याही १२ धावांवर बाद झाला अन् भारत अडचणीत सापडला. चमिका करुणारत्नेही ही विकेट घेतली. भारताचे आघाडीचे ४  फलंदाज ३४  धावांवर माघारी परतले. दीपक हुडाही ९ धावा करून बाद झाला अन् भारताने ५७ धावांवर निम्मा संघ गमावला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाहार्दिक पांड्याइशान किशनशुभमन गिल
Open in App