Join us  

Rishabh Pant vice-captain, IND vs WI T20I Series : मोठी बातमी; रिषभ पंतचे प्रमोशन, टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे मिळाले उप कर्णधारपद

Rishabh Pant vice-captain, IND vs WI T20I Series : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला १६ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 10:39 PM

Open in App

Rishabh Pant vice-captain, IND vs WI T20I Series : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला १६ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघात बदल पाहायला मिळत आहेत. भारतीय संघात खांदेपालटही झाले आहेत. विराट कोहलीने ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आणि त्यानंतर बीसीसीआयने त्याची वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी केली. बीसीसीआयने टवेंटी-२० व वन डे संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराटने कसोटीचे कर्णधारपदही सोडले आणि आता तिही जबाबदारी रोहितकडे सोपवण्याची शक्यता आहे. अशात भविष्याचा कर्णधार तयार करण्यासाठीही BCCIने पाऊले उचलली आहेत.

बीसीसीआयने रोहितचा असिस्टन्स म्हणून लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली पाहायला मिळाली. लोकेश राहुल ( KL Rahul ) याच्याकडे भविष्याचा कर्णधार म्हणून आतापासूनच पाहिले जात आहे. अशात त्याला टक्कर देणारा संघात एकच खेळाडू आहे आणि तो म्हणजे रिषभ पंत ( Rishabh Pant). त्याची सुरूवातही झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत रिषभकडे उप कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. BCCIने तशी घोषणाच केली आहे..

हा निर्णय का घेतला गेला?भारताने वन डे मालिकेत ३-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ट्वेंटी-२० मालिका गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar ) याने मांडीचे स्नायू ताणल्या गेल्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. या मालिकेतून लोकेश राहुल व अष्टपैलू अक्षर पटेल यांनी माघार घेतल्याचे जाहीर केले होते. आता वॉशिंग्टनही संघात नसणार आहे. लोकेश मालिकेत नसल्याने त्याची उप कर्णधारपदाची जबाबदारी रिषभकडे असेल...  लोकेश राहुलच्या डाव्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि त्यामुळेच त्याने तिसऱ्या वन डेतून माघार घेतली. अक्षर पटेलला मालिका सुरू होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि तो आता त्यातून सावरण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. आता ही दोघं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होतील. या दोघांच्या अनुपस्थितीत निवड समितीने ऋतुराज गायकवाड व दीपक हुडा यांची ट्वेंटी-२० संघात निवड केली आहे.  

भारताचा ट्वेंटी-२० संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत( उप कर्णधार) , वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल,  मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव ( India’s T20I squad: Rohit Sharma (Captain), Ishan Kishan, Virat Kohli, Shreyas Iyer, Surya Kumar Yadav, Rishabh Pant (vice-captain) (wicket-keeper), Venkatesh Iyer, Deepak Chahar, Shardul Thakur, Ravi Bishnoi, Yuzvendra Chahal, Mohd. Siraj, Bhuvneshwar Kumar, Avesh Khan, Harshal Patel, Ruturaj Gaikwad, Deepak Hooda, Kuldeep Yadav)  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरिषभ पंतलोकेश राहुल
Open in App