“भारतीय खेळाडू जगात सर्वोत्तम, कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करू शकतात”: तस्कीन अहमद

फलंदाजीतील उणिवांमुळे सुरू असलेल्या टी-२० मालिकेत बांगलादेशला निराश केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 09:03 AM2024-10-11T09:03:18+5:302024-10-11T09:03:49+5:30

whatsapp join usJoin us
indian players are the best in the world can play well in any situation said taskin ahmed | “भारतीय खेळाडू जगात सर्वोत्तम, कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करू शकतात”: तस्कीन अहमद

“भारतीय खेळाडू जगात सर्वोत्तम, कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करू शकतात”: तस्कीन अहमद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : ‘भारतीय क्रिकेटपटू जगात सर्वोत्तम आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत ते चांगली फलंदाजी करू शकतात,’ असे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद याने म्हटले आहे.   

फलंदाजीतील उणिवांमुळे सुरू असलेल्या टी-२० मालिकेत बांगलादेशला निराश केले आहे. या मालिकेत भारताने एक सामना शिल्लक असतानाच २-० अशी विजयी आघाडी घेतली.  तस्कीन म्हणाला की, ‘भारतीय क्रिकेटपटू सर्वोत्तम आहेत, यात कोणतीही शंका नाही. ते केवळ स्वदेशातच नाही, तर जगभरातील परिस्थितीत सर्वोत्तम आहे. ते आमच्यापेक्षा जास्त अनुभवी व उत्तम आहेत.’ बुधवारी बांगलादेशने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद करत बांगलादेशला भक्कम स्थितीत नेले होते. 

 

Web Title: indian players are the best in the world can play well in any situation said taskin ahmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.