Join us  

“भारतीय खेळाडू जगात सर्वोत्तम, कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करू शकतात”: तस्कीन अहमद

फलंदाजीतील उणिवांमुळे सुरू असलेल्या टी-२० मालिकेत बांगलादेशला निराश केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 9:03 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘भारतीय क्रिकेटपटू जगात सर्वोत्तम आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत ते चांगली फलंदाजी करू शकतात,’ असे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद याने म्हटले आहे.   

फलंदाजीतील उणिवांमुळे सुरू असलेल्या टी-२० मालिकेत बांगलादेशला निराश केले आहे. या मालिकेत भारताने एक सामना शिल्लक असतानाच २-० अशी विजयी आघाडी घेतली.  तस्कीन म्हणाला की, ‘भारतीय क्रिकेटपटू सर्वोत्तम आहेत, यात कोणतीही शंका नाही. ते केवळ स्वदेशातच नाही, तर जगभरातील परिस्थितीत सर्वोत्तम आहे. ते आमच्यापेक्षा जास्त अनुभवी व उत्तम आहेत.’ बुधवारी बांगलादेशने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद करत बांगलादेशला भक्कम स्थितीत नेले होते. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबांगलादेश