India vs Thailand Women's Asia Cup 2022 : भारतीय महिला संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. प्रथमच आशिया चषकाची उपांत्य फेरी खेळणाऱ्या थायलंड महिला संघावर हरमनप्रीत कौर व टीमने विजय मिळवला. भारताने सर्वाधिक सहा वेळा आशिया चषक उंचावल आहे आणि यंदा जेतेपदाच्या सामन्यात त्यांच्यासमोर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या विजेत्याचे आव्हान असणार आहे. भारतीय महिलांनी सलग आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
छोटा पॉकेट शफाली वर्माने दमदार खेळी केली. तिने सृती मानधनासह ( १३) पहिल्या विकेटसाठी ३८ धावा जोडल्या आणि त्यानंतर जेमिमा रॉड्रीक्ससह ( २७) चांगला खेळ केला. शफालीने २८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४२ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३० चेंडूंत ३६ धावा केल्या. पूजा वस्त्राकरच्या नाबाद १७ धावांनी भारताला ६ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारून दिली. थायलंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना भारताच्या धावगतीला लगाम लावली. सोर्नारिन तिप्पोचने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"