Join us

MI vs RCB : "रोहित पुन्हा परतल्यामुळे...." पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पांड्या?

हार्दिक पांड्याने जोर लावला, त्याला तिलक वर्माची साथ मिळाली. पण शेवटी पदरी पडला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 01:08 IST

Open in App

IPL 2025 MI vs RCB  20th Match  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाची यंदाच्या हंगामातील सुरुवातही गत हंगामाप्रमाणेच खराब झाली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने जोर लावला, त्याला तिलक वर्माची साथ मिळाली. पण शेवटी मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामातील आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. RCB विरुद्धच्या सामना संघाने १२ धावांनी गमावला.  पाच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पदरी पडलेला हा चौथा पराभव ठरला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

धावांचा पाठलाग करताना तिलक वर्मासह पांड्याने जोर लावला, पण...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना २२१ धावा करत मुंबई इंडियन्ससमोर २२२ धावांचे टार्गेट सेट केले होते. गोलंदाजीवेळी हार्दिक पांड्याने संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.  आरसीबीने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाला निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात २०९ धावांपर्यंत मजल मारता आली. आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर तिलक वर्मानं २९ चेंडूत ५६ धावांची दमदार खेळी केली. हार्दिक पांड्याने १५ चेंडूत ४२ धावा करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या, पण ही जोडी तंबूत परतली अन् मुंबई इंडियन्स पुन्हा फसली. आरसीबीकडून क्रुणाल पांड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय यश दयाल आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी २-२ विकेट्सह भुवनेश्वर कुमारने एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली.

IPL 2025 MI vs RCB : हिटमॅनचा फ्लॉप शो कायम! रितिकाचा चेहरा पडला; 'विराट' सेलिब्रेशनही चर्चेत

RCB विरुद्धच्या अपयशानंतर भावूक झालेल्या हार्दिकला भाऊ क्रुणालनं दिला धीर 

मुंबईच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागल्यावर हार्दिक पांड्या निराश आणि भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या चेहऱ्यावर निऱासा स्पष्ट दिसत होती. आरसीबीच्या ताफ्यातून खेळणारा मोठा भाऊ क्रुणाल पांड्या याने सामन्यानंतर हार्दिकची गळाभेट घेत त्याचे सांत्वन केल्याचेही पाहायला मिळाले.

पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पांड्या?

आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. आम्ही या सामन्यात दोन हिट्स मारण्यात कमी पडलो. याशिवाय आणखी काय बोलावे सुचत नाही. गोलंदाजांसाठी परिस्थिती कठीण होती. त्यांना हेच वाटत असेल की, १२ धावा कमी दिल्या असत्या तर निकाल वेगळा असता. याआधीच्या सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नव्हता. त्यामुळे आम्ही नमन धीरला बढती दिली. पण रोहित पुन्हा परतल्यामुळे त्याला खालच्या क्रमांकावर खेळवण्याची वेळ आली. बॅटिंग ऑर्डरमधील या बदलाशिवाय तिलक वर्माच्या रिटायर्ड आउटचा मुद्यावर तो पुन्हा एकदा बोलला. तिलक वर्मासंदर्भात आधीच्या सामन्यात घेतलेला निर्णय हा टेक्निकली होता. आज तो उत्तम खेळला, असेही पांड्याने म्हटले आहे. नमन धीरच्या बॅटिंग ऑर्डरबद्दल व्यक्त होताना पांड्याने अप्रत्यक्षरित्या रोहितला पराभवासाठी जबाबदार धरल्याचे दिसून येते. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्यारोहित शर्मा