Join us  

आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

आता आयपीएलमधून माघार घेतली तर अशा खेळाडूच्या विरोधात कठोर पाऊल उचललं जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 12:00 PM

Open in App

क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी आता काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. आयपीएलसाठी आयसीसीनेही एक स्पेशल विंडो दिलीये. त्यामुळे ही स्पर्धा जगात भारी ठरते. पाकिस्तानचे खेळाडू सोडले तर जवळपास सर्वच देशातील खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून मालामाल होण्याची संधी असते. नव्या नियमात खेळाडूंना सामना फी (Match Fees) देण्याची तरतूद करत बीसीसीआयने या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंचा मोबदला आणखी वाढवला आहे. कारण करारात मिळणाऱ्या रक्कमेच्या पलिकडे खेळाडूच्या कमाईत यामुळे अधिक भर पडेल. पण या फायद्याच्या नियमासोबत आणखी एक नियम आहे जो या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूला अगदी गोत्यात आणणारा आहे. हा नियम मोडणाऱ्या खेळाडूला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

IPL मध्ये आल्यावर मागं फिरायचं नाय; बीसीसीआयचा खेळाडूंना वेसण घालणारा नियम

आयपीएलच्या लिलावात मोठी बोली लागल्यानंतर अनेकदा असे पाहायला मिळाले आहे की, खेळाडू कोणत्या ना कोणत्या कारणावरून स्पर्धेतून माघार घेतात. ज्याचा मोठा फटका फ्रँचायझी संघाला बसतो. पण बीसीसीआयनं आता नव्या नियमाच्या माध्यमातून खेळाडूंना वेसण घालण्याचा प्रयत्न केला आहे. आयपीएलच्या नव्या नियमावलीत (IPL Player Regulations 2025-27) यासंदर्भात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. 

माघार घेतली तर पुढचे दोन हंगाम विसरा; BCCI चा स्पष्ट संदेश

आयपीएल सुरु होण्याआधी या स्पर्धेतून माघार घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू आघाडीवर असल्याचे याआधी पाहायला मिळाले आहे. पण आता  आयपीएलमधून माघार घेतली तर अशा खेळाडूच्या विरोधात कठोर पाऊल उचललं जाणार आहे. आयपीएलमधून माघार घेणाऱ्या खेळाडूवर  पुढच्या दोन हंगामासाठी बंदी  घालण्यात येईल, असा उल्लेख आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नव्या नियमावलीत करण्यात आला आहे. 

दुखापतीचं काय?

बीसीसीआयच्या नव्या नियमावलीनुसार, स्पर्धेतून माघार घेणाऱ्या खेळाडूला दोन वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागणार हे स्पष्ट आहे. पण कोणत्या परिस्थितीत ही कारवाई होणार हे स्पष्ट नाही. पण या नियमाचा उद्देश मनमानी करणाऱ्या खेळाडूंना आवर घालणे हाच दिसतो. त्यामुळे  दुखापतीमुळे जर एखाद्या खेळाडूवर माघार घेण्याची वेळ आली तर त्याला या नियमाचा फटका बसणार नाही, 

टॅग्स :आयपीएल २०२४बीसीसीआयइंडियन प्रीमिअर लीग