Join us  

Shoaib Akhtar Sourav ganguly: 'गांगुलीच्या बरगडीत जाणूनबुजून बॉल मारला', शोएब अख्तरचा 23 वर्षानंतर मोठा खुलासा

Shoaib Akhtar Sourav ganguly: भारत आणि पाकिस्तानदरम्यान 1999 मध्ये मोहालीत झालेल्या सामन्याबाबत शोएब अख्तरने मोठा खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 6:33 PM

Open in App

Shoaib Akhtar Sourav ganguly: भारत आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतो. हे दोन देश एकमेकांसमोर आल्यावर साऱ्या जगाची नजर सामन्यावर असते. दोन्ही देशाचे संघ दमदार असल्यामुळे लढत नेहमीच चुरशीची होते. यावेळी खेळाडू जिंकण्यासाठी काहीही करायला तयार असतात. 

कधी-कधी खेळाडू एकमेकांना दुखापतग्रस्तही करतात. असाच एक धक्कादायक खुलासा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केला आहे. 23 वर्षांपूर्वी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत त्याने केलेल्या खुलाशाने सर्वजण चकीत झाले आहेत. त्या सामन्यात सौरव गांगुलीसह इतर भारतीय खेळाडूंना जाणूनबुजून जखमी करण्याची रणनीती पाकिस्तान संघाने आखली होती, अशी माहिती अख्तरने दिली.

'गांगुलीला जखमी करण्याची रणनीती'1999 मध्ये मोहाली येथे भारत-पाक सामना झाला होता. त्या सामन्याबाबत शोएब अख्तरने भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागशी संवाद साधला. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात दोघे बोलत होते. यादरम्यान अख्तर म्हणाला, 'त्या सामन्यात मी सतत फलंदाजाच्या डोक्याला आणि बरगड्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होतो. सौरव गांगुलीच्या बरगडीवर चेंडू मारण्याची रणनीती आम्ही आखली होती. विशेष म्हणजे ही रणनीती एका दिवसापूर्वी संपूर्ण टीमने बनवली होती.'

अख्तर पुढे म्हणाला, 'संघाच्या बैठकीत मला भारतीय फलंदाजांना जखमी करण्यास सांगितले होते. मी विचारले की फलंदाजांना बाद करायचे नाही का? त्यावर इतर गोलंदाज म्हणाले, तुझ्याकडे वेग आहे, तू त्यांना जखमी कर. त्यांना बाद करण्याचे काम आम्ही करू.' विशेष म्हणजे, अख्तरने त्या सामन्यानंतर सौरव गांगुलीला त्या रणनीतिबाबत सांगितले होते. 

टॅग्स :सौरभ गांगुलीशोएब अख्तरभारतीय क्रिकेट संघपाकिस्तान
Open in App