Join us  

SL vs IND : अविश्वसनीय! रोहितचं अर्धशतक तरी भारताचा संघर्ष; श्रीलंकेने तोंडचा घास पळवला

SL vs IND 1st ODI Match Live Macth : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना अनिर्णित संपला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 9:57 PM

Open in App

SL vs IND 1st ODI Match Live Macth Updates In Marathi | कोलंबो : पहिल्या वन डे सामन्यात भारतीय संघ सहज विजय मिळवेल असे अपेक्षित असताना यजमान श्रीलंकेने पाहुण्या टीम इंडियाला चांगलाच संघर्ष करण्यास भाग पाडले. कर्णधार रोहित शर्माने स्फोटक खेळी करताना श्रीलंकेवर दबाव टाकला. पण, रोहित बाद होताच यजमानांनी पुनरागमन केले. श्रीलंकेने दिलेल्या २३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार खेळी केली. रोहितने त्याचे आवडते शॉट्स खेळून श्रीलंकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. हिटमॅनने ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४७ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. पण, भारताला विजय साकारता आला नाही आणि यजमानांनी सामना अनिर्णित केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवली जात आहे. 

श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल या जोडीने भागीदारी करून डाव सावरला. मात्र, त्यांनाही अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकता आले नाही. अखेर टीम इंडिया ४७.५ षटकांत २३० धावांवर सर्वबाद झाल्याने सामना अनिर्णित झाला. भारताला विजयासाठी एक धाव हवी असताना अर्शदीप सिंग मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाल्याने भारताच्या तोंडचा घास गेला.

भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक (५८) धावा केल्या, तर शुबमन गिल (१६), विराट कोहली (२४), वॉशिंग्टन सुंदर (५), श्रेयस अय्यर (२३), लोकेश राहुल (३१), अक्षर पटेल (३३), शिवम दुबे (२५), कुलदीप यादव (२), मोहम्मद सिराज (५) आणि अर्शदीप सिंग खातेही न उघडता तंबूत परतला. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि कर्णधार चरिथ असलंका यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले, तर डुनिथ वेललेज (२), असिथा फर्नांडो आणि अकिला धनंजया यांना १-१ बळी घेण्यात यश आले.

तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेकडून पथुम निसांकाने (५६) चांगली खेळी केली. इतर सर्व फलंदाज संघर्ष करत असताना डुनिथ वेललेजने (नाबाद ६७ धावा) अखेरच्या काही षटकांमध्ये डाव सावरून घरच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. अखेर श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद केवळ २३० धावा करू शकला. भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने शुबमन गिलला एक षटक टाकण्याची संधी दिली, ज्यात गिलने १४ धावा दिल्या. भारताकडून अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी २-२ बळी घेतले, तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माश्रेयस अय्यरअक्षर पटेलभारतीय क्रिकेट संघ