"IPL नंतर कोहली आणि गंभीर एकमेकांना भेटून मिठी मारतील", 'विराट' वादानंतर हरभजनचं मोठं विधान

virat kohli and gautam gambhir ipl 2023 : आयपीएलमध्ये लखनौ विरूद्ध बंगळुरू हा सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 12:25 PM2023-05-03T12:25:10+5:302023-05-03T12:25:37+5:30

whatsapp join usJoin us
 Virat Kohli and Gautam Gambhir will definitely meet and hug each other after IPL 2023, says former Indian player Harbhajan Singh  | "IPL नंतर कोहली आणि गंभीर एकमेकांना भेटून मिठी मारतील", 'विराट' वादानंतर हरभजनचं मोठं विधान

"IPL नंतर कोहली आणि गंभीर एकमेकांना भेटून मिठी मारतील", 'विराट' वादानंतर हरभजनचं मोठं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

harbhajan singh on virat kohli । मुंबई : आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना वादामुळे चांगलाच चर्चेत राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB vs LSG) यजमान लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्याच घरात पराभव केला. पण खेळ भावनेला ठेच पोहचवणाऱ्या काही घडामोडी या सामन्यात झाल्या. त्यामुळे या सामन्याने अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांच्या वादावर अनेक क्रिकेटपटू प्रतिक्रिया देत आहेत. अशातच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने या वादावर नाराजी व्यक्त केली होती. 

दरम्यान, आता हरभजन सिंगने आयपीएलनंतर दोन्ही खेळाडूंची भेट होईल असे म्हटले आहे. भज्जीने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना विविध बांबीवर भाष्य केले. विराट एक मोठा खेळाडू आहे. त्याने कोणाला काय बोलायला नको हवे होते. क्रिकेटमधील अनेक मोठे खेळाडू विराट, गंभीर आणि नवीन यांच्यामध्ये चुका काढतील. पण हे चित्र क्रिकेटसाठी चांगले नाही. पण IPL नंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भेटतील आणि मिठी मारतील याची मी खात्री देतो. हा लढा इथेच संपला असे मी खात्रीने सांगत असल्याचे भज्जीने सांगितले.

लखनौचा १८ धावांनी पराभव
सोमवारी झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार फाफ डू प्लेसिस (४४) आणि विराट कोहली (३१) वगळता कोणत्याच आरसीबीच्या फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. निर्धारित २० षटकांत आरसीबीचा संघ ९ बाद १२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौच्या फलंदाजांची देखील वाईट अवस्था झाली. कृष्णप्पा गौतम (२३) वगळता एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. कर्णधार लोकेश राहुलच्या दुखापतीमुळे लखनौच्या संघाची डोकेदुखी वाढली. अखेर लखनौचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही आणि १९. ५ षटकांत १०८ धावांवर सर्वबाद झाला. आरसीबीने १८ धावांनी विजय मिळवून लखनौला पराभवाची धूळ चारली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 


 

Web Title:  Virat Kohli and Gautam Gambhir will definitely meet and hug each other after IPL 2023, says former Indian player Harbhajan Singh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.