IND vs SL, 1st Test Live Updates : विराट कोहलीचा १०० वा सामना म्हणूनच ही कसोटी महत्त्वाचा नाही, तर ११ वर्षांनंतर भारतीय क्रिकेटमध्ये घडलंय काहीतरी 'अजब'!

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारत-श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी सामना हा केवळ माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा हा १०० वा सामना म्हणूनच महत्त्वाचा नाही. या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत.

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारत-श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी सामना हा केवळ माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा हा १०० वा सामना म्हणूनच महत्त्वाचा नाही. या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये ११ वर्षांत जे कधीच घडलं नव्हतं, हे या सामन्यात घडताना दिसले. रोहित शर्मा प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करत असला तरी त्याव्यतिरिक्त त्याने वेगळा विक्रमही नोंदवला.

२००८मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या विराटला कसोटी पदार्पणासाठी २०११ची प्रतीक्षा पाहावी लागली. त्याने ९९ कसोटीत ५०.३९च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. त्यात २७ शतकं व२८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. कसोटीत त्याच्या नावावर १०० झेल आहेत, शिवाय २४ षटकात व ८९६ चौकारही आहेत.

भारताकडून १०० कसोटी खेळलेले खेळाडू -सुनील गावस्कर ( १९८४), दीलीप वेंगसरकर ( १९८८), कपिल देव ( १९८९), सचिन तेंडुलकर ( २००२), अनिल कुंबळे ( २००५), राहुल द्रविड ( २००६), सौरव गांगुली ( २००७), व्ही व्ही एस लक्ष्मण ( २००८), वीरेंद्र सेहवाग ( २०१२), हरभजन सिंग ( २०१३) , इशांत शर्मा ( २०२१), विराट कोहली ( २०२२)

भारतासाठी २५० वन डे व १०० कसोटी खेळणारे चार खेळाडू आहेत आणि त्यात आज विराटचा समावेश झाला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर भारताकडून २५० वन डे व १०० कसोटी खेळणाऱ्या यादीत विराट कोहलीचे नाव लिहिले गेले आहे.

या यशाबद्दल बीसीसीआयकडून विराट कोहलीला विशेष भेट देण्यात आली. यावेळी त्याच्यासोबत पत्नी अनुष्का शर्माही ( Anushka Sharma) मैदानावर उपस्थित होती. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हस्ते ही कॅप देण्यात आली आणि द्रविडने विराटचे कौतुक केले. त्याने २०० कसोटी खेळावेत अशा शुभेच्छाही दिल्या.

भारत ११ वर्षांत प्रथमच चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे यांच्याशिवाय कसोटी खेळत आहे.

श्रीलंकेचाही हा ३०० वा कसोटी सामना आहे. भारताच्या सलामीवीराकडे कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व जाण्याची ही दुसरी वेळ. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने असा विक्रम नोंदवला होता. त्याशिवाय कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० कारकीर्दिची सुरुवात सलामीवीर म्हणून नाही झाली, परंतु त्यानं या तीनही फॉरमॅटची सूत्र हाती घेतली तेव्हा तो सलामीवीर आहे, असा रोहित शर्मा हा जगातील एकमेव खेळाडू आहे.