न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीमुळे संकटाच्या काळात भारताचा डाव सावरलेल्या श्रेयस अय्यरच्या खेळीकडे दुर्लक्ष झाल्याची भावना क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. खरेतर गिल, रोहित आणि विराट यांच्या विकेट स्वस्तात गेलल्या असताना बिकट परिस्थितीत अय्यरने भारताचा डाव सावरला होता. त्याच्या खेळीमुळेच भारताला २४९ चा आकडा गाठता आला होता. त्याला सामनावीर घोषित करायला हवे होते, त्याच्यावर अन्याय झाल्याचे चाहते सांगत आहेत.