भारतीय संघाने कॅरेबियन बेटांवर नुकताच पार पडलेला विश्वचषक जिंकला. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला.
गेल्या १३ वर्षात टीम इंडियाला ICC आयोजित स्पर्धांमध्ये विजेतेपदाने अनेकदा हुलकावणी दिली होती. यंदा मात्र भारताला विजय मिळवता आला.
भारताचे दोन दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासाठी हा शेवटचा टी२० वर्ल्ड कप होता. त्यामुळे हा विजय आणखी खास ठरला.
भारताच्या विजयानंतर रोहित शर्माने अनोख्या पद्धतीने ट्रॉफी उंचावली. सोबतच संघ प्रशिक्षक राहुल द्रविडने जल्लोष केला.
लवकरच ही ट्रॉफी घेऊन टीम इंडिया भारतात परतणार आहे. परंतु त्या आधी ज्या भूमीवर भारताने वर्ल्ड कप जिंकला, तेथे एक खास फोटोशूट करण्यात आला.
कॅरेबियन बेटांवर भारताने विश्वचषकाची ट्रॉफी जिंकली. त्याच बेटांवरील पिचवरचे गवत खाऊन रोहित शर्माने त्या मातीचे, धरतीचे आभारही मानले.