पाण्याची बाटली आण सांगून मोबाईल पळवला; भाईंदरमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 05:31 PM2022-01-08T17:31:10+5:302022-01-08T17:31:47+5:30

एका तरुणास कॉल करायचा सांगून त्याचा मोबाईल घेत बोलणाऱ्या भामट्याने त्या तरुणास पाण्याची बाटली आणायला पाठवत मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे

Brought a bottle of water and snatched the mobile | पाण्याची बाटली आण सांगून मोबाईल पळवला; भाईंदरमधील प्रकार

पाण्याची बाटली आण सांगून मोबाईल पळवला; भाईंदरमधील प्रकार

googlenewsNext

मीरारोड - एका तरुणास कॉल करायचा सांगून त्याचा मोबाईल घेत बोलणाऱ्या भामट्याने त्या तरुणास पाण्याची बाटली आणायला पाठवत मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे . मदत करायला गेला आणि मोबाईल गमावून बसला अशी पाळी तरुणावर आली आहे .

भाईंदर पोलीस ठाण्या मागील शास्त्री नगर मध्ये राहणारा करण कानु (२०) हा गुरुवारी सायंकाळी कामावरून घरी जेवणासाठी पायी चालला होता . त्यावेळी राजेश हॉटेल जवळ एका अनोळखी इसमाने त्याला हाक मारत टेम्पोतील सामान काढायचे असून बिगारी ओळखीचा आहे का विचारले . करण याने त्याच्या भागातील एका बिगारीला कॉल करून येण्यास सांगितले . दरम्यान त्या इसमाने एका नंबरवर कॉल लाव सांगितले असता करण याने कॉल लावून मोबाईल त्याला दिला . बोलता बोलता त्या इसमाने पाण्याची बाटली घेऊन ये सांगून ५० रुपये दिले असता करण पाणी आणण्यास गेला . बाटली घेऊन परतला असता तो इसम दिसला नाही . त्याचा शोध घेऊन देखील तो न सापडल्याने १५ हजारांचा मोबाईल पळवल्या प्रकरणी अनोळखी इसमा विरुद्ध भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

Web Title: Brought a bottle of water and snatched the mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.