धक्कादायक! आईच्या अफेअरबाबत समजताच 2 मुलांची आत्महत्या; ग्रामस्थांनी महिलेला दिली भयंकर शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:22 PM2021-08-24T17:22:24+5:302021-08-24T17:31:43+5:30

Crime News : गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या गावातील महिलांनी या महिलेला भयंकर शिक्षा दिली आहे. केसांना धरून ओढत रस्त्यावर नेलं आणि तिला बेदम मारहाण केली आहे.

Crime News young sons hanged mother love affair theory villagers beat up hooghly bengal | धक्कादायक! आईच्या अफेअरबाबत समजताच 2 मुलांची आत्महत्या; ग्रामस्थांनी महिलेला दिली भयंकर शिक्षा

धक्कादायक! आईच्या अफेअरबाबत समजताच 2 मुलांची आत्महत्या; ग्रामस्थांनी महिलेला दिली भयंकर शिक्षा

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या अफेअरबाबत समजताच 2 तरुण मुलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या गावातील महिलांनी या महिलेला भयंकर शिक्षा दिली आहे. केसांना धरून ओढत रस्त्यावर नेलं आणि तिला बेदम मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, 

महिलेच्या 22 वर्षीय कृष्ण दास आणि 20 वर्षीय कौशिक दास या दोन मुलांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर गावात एकच गोंधळ उडाला. आईच्या प्रेम प्रकरणाबद्दल मुलांना माहिती झालं होतं. याच कारणामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. तसेच गावातील लोकांनी या महिलेसह तिच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचाही संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर आता मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावातील महिलांनी स्वतःच या मुलांच्या आईला शिक्षा दिली आहे. 

महिलांनी तिला केसाला पकडून रस्त्यावर ओढत आणलं. यानंतर तिला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी माहिती देताना आरामबागचे एसडीपीओ अभिषेक मंडल यांनी महिलेला मारहाण केली गेली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेच्या दोन मुलांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यावर हे स्प्ष्ट होईल असं म्हटलं आहे. या प्रकरणात आणखी एक बाजू समोर येत आहे ती अशी की, कृष्णादास याचं काही दिवसांपूर्वी आपली पत्नी पिया हिच्यासोबत भांडण झालं होतं. यानंतर त्याची पत्नी माहेरी गेली होती. 

कृष्णा दासने यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. जेव्हा कौशकला हे माहिती झालं तेव्हा तो हे दुःख सहन करू शकला नाही आणि त्यानेही गळफास घेतला. तर दुसरीकडे कृष्णा दासच्या पत्नीने पती आणि दिराच्या हत्येचा आरोप आपल्या सासूवर केला आहे. सासूनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून या दोघांची हत्या केली आहे असं म्हटलं आहे. आपल्याला खोट्या आरोपात फसवलं जात असल्याचं या मुलांच्या आईचं म्हणणं आहे. मुलाचं सुनेसोबत भांडण झालं होतं, याच कारणामुळे त्यानं आत्महत्या केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Crime News young sons hanged mother love affair theory villagers beat up hooghly bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.